ट्रेनला उशीर झाला तर तिकिटाची संपूर्ण रक्कम परत मिळणार; नाश्ता- जेवणही फ्री मिळणार

रेल्वेमंत्र्यांची घोषणा


नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करत असाल आणि तुमच्या गाडीला उशिर झाला तर तुम्हाला तिकिटाची संपूर्ण रक्कम परत दिली जाणार आहे. तुम्ही प्रवास करत असणाऱ्या एक्स्प्रेसला तीन तासांपेक्षा जास्त उशिर झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे रिफंड मिळणार आहेत. एवढेच नाही तर नाश्ता- जेवणही फ्री मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही मोठी घोषणा केली आहे.


अनेकदा एक्स्प्रेस विविध कारणांमुळे उशिरा धावत असतात. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यात तिकीट रद्द केल्यास पूर्ण रिफंड मिळत नाही. पण आता यात बदल करण्यात आला आहे. आता ३ तास ट्रेन उशिराने असल्यास, तिकीटाचे संपूर्ण पैसे मिळणार आहेत. मग ती तिकीट कन्फर्म असो किंवा मग आरएसी.


हिवाळ्यात अनेकदा धुक्यात गाड्या उशिराने धावतात. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु अशा परिस्थितीत रेल्वे तुम्हाला अनेक सुविधा देते. मात्र, आता तुमची गाडी तीन तास उशिराने असेल तर तिकीट परताव्याची संपूर्ण रक्कमही परत केली जाणार आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २०

रेड कॉरिडॉर आता ग्रोथ कॉरिडॉर बनला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पोलिस स्मृतीदिनानिमित्त वक्तव्य

नवी दिल्ली: पोलीस स्मृतीदिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील पोलीस आणि सुरक्षा दलांच्या