ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; कार जळून खाक

डेहराडून : ऋषभ पंत हा २५ वर्षीय क्रिकेटपटू शुक्रवारी पहाटे एका रस्ता अपघातात थोडक्यात बचावला. अपघातानंतर खिडकी तोडून पंत जळत्या कारमधून बाहेर पडला. त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झोपेमुळे हा अपघात झाला. त्याची मर्सिडीज नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला धडकली, त्यानंतर तिला आग लागली आणि ती उलटली.


हा अपघात पहाटे साडेपाच वाजता रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर ढालच्या वळणावर झाला. तो स्वतःची कार क्रमांक DL 10 CN 1717 चालवत होता. डुलकी घेतल्यानंतर त्यांची मर्सिडीज अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली. हे ठिकाण त्यांच्या घरापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. त्यावेळी कारचा वेग ताशी 150 किमी होता. कार 200 मीटरपर्यंत सरकत गेली.


त्याला रुरकीहून डेहराडूनला उपचारासाठी नेण्यात आले आहे. त्यांच्यावर येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. गरज पडल्यास त्यांना विमानाने दिल्लीला नेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंतच्या डोक्याला, पायाला, पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. अपघातामध्ये ऋषभ पंतच्या चेहऱ्याला, डोक्याला गंभीर जखम झाली आहे. त्यामुळे ऋषभ पंतची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.


उत्तराखंडचे पोलिस महासंचालक अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत हा कारमध्ये एकट्यानेच प्रवास करत होता. पहाटे कार चालवताना ऋषभ पंतला झोप आली होती. त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले.


पोलिस महासंचालक अशोक कुमार यांनी सांगितले की, अपघातनंतर ऋषभ पंतच्या कारला आग लागली. त्यामुळे पंत जळत्या कारची खिडकी तोडून बाहेर आला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतची प्रकृती सध्या स्थिर आहे.


आईला सरप्राईज देण्यासाठी पंत हा एकटाच घरी जात होता.


ऋषभ पंतवर उपचार करणारे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, त्यांच्या गुडघ्याचे कोणते हाड मोडले आहे हे एमआरआय नंतरच कळेल. त्यानंतरच ऋषभ पंत पुढे खेळू शकेल की नाही?, हे सांगता येईल.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे