Bacchu Kadu : केवळ भाषणाने मते मिळत नाहीत


आमदार बच्चू कडूंचा राज, उद्धव यांच्यासह आदित्य ठाकरेंवर 'प्रहार'


अमरावती : केवळ भाषण दिल्याने आणि फेसबुकवर गोड गोड बोलून मते मिळत नाहीत, असा टोला आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंसह शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना हाणला आहे.


अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथे आयोजित कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते. जात आणि धर्म लावला तर पक्ष वाढवायला वेळ लागत नाही. सहज पक्ष वाढतो असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले. आपण मनसे पाहिला असेल, ते मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा असे म्हणायचे. केवळ बोलण्याने मते मिळत नसतात असे कडू म्हणाले. मनसेच्या १३ आमदारांना महाराष्ट्र आता विसरुन गेला असल्याचे बच्चू कडू म्हणाले. मी चार वेळा निवडून आलो. जातीचे सोंग नाही, जातीचा झेंडा नाही, धर्माचा झेंडा नाही, कोणताही नेता बोलावला नाही. तुमच्यासारख्या सामान्य माणसांनी देशात इतिहास केला. अपक्ष माणूस एकदा नाहीतर चार वेळा निवडून दिला असल्याचे कडू म्हणाले. माझे काम बघूनच तुम्ही मला निवडून दिल्याचे कडू म्हणाले.


ज्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, ज्याला ऐकू येत नाही त्यांच्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरलो आहे. या सर्व वेदना विधानसभेत मी मांडल्या आहेत माझ्यावर ३५० गुन्हे दाखल झाले असल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले. राज ठाकरेंना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना विचारा बरं किती गुन्हे दाखल आहेत? असा सवालही बच्चू कडूंनी या सभेत बोलताना केला.


फक्त फेसबूकवर गोड गोड बोलून मते मिळत नाही असेही ते म्हणाले. बोल बच्चन करुन काही होत नाही. कर्म, कर्तव्य करणे गरजेचे आहे. कष्ट करावे लागते, असेही कडू म्हणाले.

Comments
Add Comment

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक