पोलीस दलात मोठे फेरबदल

एटीएस प्रमुखपदी सदानंद दाते


मुंबई : मुंबईसह राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बदल्यांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्य पोलीस दलात वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागाकडून जारी करण्यात आले आहे. यात मुंबई पोलीस दलातील चारही सहपोलीस आयुक्त बदलण्यात आले आहेत.


मीरा भायंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची एटीएसच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून मुंबई गुन्हे शाखेची जबाबदारी लखमी गौतम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था सहपोलीस आयुक्तपदी सत्यनारायण चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस महासंचालक पदावर बदली करण्यात आली आहे. तर नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी मिलिंद भारंबे यांची वर्णी लागली आहे.


पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची आयुक्तपदावरून अपर पोलीस महासंचालक कायदा सुव्यवस्था या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. पुणे आयुक्तपद रिक्त ठेवण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांची बदली करून त्यांच्या जागी मिलिंद भारंबे यांची वर्णी लागली आहे.

Comments
Add Comment

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद

Maharashtra Rain Updates : पावसाचा जोर कायम! आज कुठे-कुठे कोसळणार वादळी पाऊस? २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हवामान खात्याचा मोठा इशारा

मुंबई : सध्या दिवसभर जाणवणाऱ्या 'ऑक्टोबर हीट' (October Heat) मुळे नागरिक हैराण झाले असून, राज्यात उकाडा चांगलाच वाढला आहे.

Phaltan Doctor death case : ब्रेकिंग! फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर अखेर अटक

सातारा : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Suicide) प्रकरणात आता एक

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात