Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वराचे दर्शन पडणार महागात

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहरात (Trimbakeshwar) खासगी वाहनांनी येणाऱ्या भाविक-पर्यटकांना वाहन प्रवेश फीसह शहरात जितके तास वाहन थांबणार तितके पैसे मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे दर तासाला भाडे वाढत जाणार आहे. म्हणजे मंदिरात दर्शनासाठी वेळ लागला तर भाविक-पर्यटकांना जास्तीचा भुर्दंड बसणार आहे. तसेच त्र्यंबक नगर परिषदेने जाहीर केलेल्या पार्किंग झोनमध्ये ही वाहने न लावता इतरत्र पार्क केली तर संबंधित वाहनधारकांना मोठा दंडदेखील आकारला जाणार आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना दर्शनाआधी पार्किंग आणि नो पार्किंग झोनच्या फलकांचेच ‘दर्शन’ घ्यावे लागणार आहे. अन्यथा त्यांना त्र्यंबकराजाचे ‘दर्शन’ महागात पडणार आहे.


बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने आता पार्किंगचा ठेका देण्याचे ठरवले असून, तशी निविदाही प्रसिद्ध केली आहे. नगर परिषदेस या माध्यमातून वर्षाकाठी किमान ५९ लाख रुपये मिळणार आहेत. पार्किंग झोनशिवाय इतरत्र पार्क केलेली वाहने उचलण्यासाठी दोन टोईंग व्हॅनचाही वापर करण्यात येणार आहे.


दरम्यान, शहरात प्रवेश करतांना भाविक पर्यटकांच्या वाहनांना नगर परिषद वाहन प्रवेश फी म्हणून पैसे द्यावे लागणार आहेत. त्यामध्ये बससाठी १२०, मिनी बसला ७०, तर कार व जीपसाठी ५० रूपये आकारले जातात. या वाहन प्रवेश फीचा वार्षिक ठेका ९२ लाख रुपयांना देण्यात आला आहे. त्यात आता पार्किंग फी द्यावी लागणार असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना त्र्यंबकराजाचे दर्शन दुप्पट महागले आहे.

Comments
Add Comment

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर