World Swimming : सोलापूरची कीर्ती भराडिया जलतरणाच्या विश्वविक्रमासाठी सज्ज

  546

सोलापूर (वार्ताहर) : सोलापूरमधील कीर्ती नंदकिशोर भराडिया (वय १६ वर्षे) ही जलतरणपटू (World Swimming) अरबी समुद्रात ३६ किलोमीटरचे अंतर न थांबता पोहून पूर्ण करीत विश्वविक्रमाला गवसणी घालणार आहे.


गुरुवार २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबईलगतच्या अरबी समुद्रात वरळी सी लिंक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंतचे अंतर सलग आठ ते दहा तास पोहून पूर्ण करणार आहे.


कीर्ती भराडीया गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सोलापूरमधील मार्कंडेय जलतरण तलाव येथे सहा ते सात तास सराव करत आहे. कीर्तीला प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. उत्तम आहार घेण्याकरिता डॉक्टर सोनाली घोंगडे यांचे कीर्तीला मार्गदर्शन मिळाले आहे. साहस व विक्रमाचे परीक्षण करण्याकरिता वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे अधिकारी पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत.


तिच्या पूर्णवेळ पोहण्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. स्विमिंग असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्याकडून विविध प्रकारच्या परवानग्या घेतल्या आहेत. सात ते आठ महिन्यांपासून कीर्ती भराडीया हिने मुंबईमध्ये अरबी समुद्रात पोहण्याचा सराव केला आहे. विश्वविक्रम पूर्ण करण्याकरिता तिला पोहताना खारे पाणी, ऊन, समुद्रातील उलट लाटा, सायंकाळी अंधार अशा अडचणींवर मात करावी लागणार आहे.

Comments
Add Comment

मुख्याध्यापक लंके यांच्या बदलीविरोधात आंदोलन, शाळेला कुलुप लावण्याचा पालकांचा इशारा

नगर (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची

बीड विनयभंग प्रकरण: आरोपी विजय पवारवर आणखी गंभीर आरोप; एसआयटी चौकशीचे आदेश

बीड : बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार