PM Modi : पंतप्रधानांच्या हस्ते ग्रीनफिल्ड विमानतळाचे लोकार्पण

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील इटानगर इथल्या पहिल्या ग्रीनफिल्ड विमानतळाचे (Greenfield Airport) आज, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लोकार्पण केले. (Inauguration of Greenfield Airport by Prime Minister Modi) यावेळी पंतप्रधानांनी ६०० मेगावॅट क्षमतेचे कामेंग जलविद्युत केंद्राचे देखील लोकार्पण केले. पंतप्रधानांनी २०१९ मध्ये या विमानतळाचा पायाभरणी केली होती. या विमानतळाच्या संपूर्ण कामाला ६४५ कोटी रुपये खर्च आला.


यावेळी पंतप्रधान (PM Modi) म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर भारताचा ईशान्य भाग अनेक दशकांपासून दुर्लक्षित राहिला. अटलजींचे सरकार आल्यावर पहिल्यांदाच या ठिकाणी बदल करण्याचा प्रयत्न झाला. ईशान्येच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय असणारे हे पहिले सरकार होते. तुम्हाला माहिती आहे का की, आम्ही एक अशी कार्यसंस्कृती आणली आहे, ज्याच्या माध्यमातून हे सरकार ज्या प्रकल्पांची पायाभरणी करते, त्यांचे उद्घाटनही करते. पूर्वीच्या सरकारप्रमाणे 'अडकले, लटकले, भटकले'चे युग गेले. दिशाभूल करण्याची वेळ गेली असे पंतप्रधानांनी सांगितले.


मोदी (PM Modi) पुढे म्हणाले की, आमचे स्वप्न फक्त भारतमातेसाठी आहे, अरुणाचलच्या या यशाबद्दल संपूर्ण ईशान्येचे अभिनंदन, पूर्वी लोक इथे फक्त निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचे. मात्र आता इथले आता वातावरण बदलत आहे. आता केवळ प्रयत्नच नाही तर विकासही दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



अग्रलेख : भारत जोडो नव्हे, ‘तोडो’ यात्रा

Comments
Add Comment

किमान लष्कराला तरी राजकारणात ओढू नका; राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

नवी दिल्ली : आरक्षण असले पाहिजे. आरक्षणाच्या बाजूने आम्ही देखील आहोत. आमचा पक्षानेही… जेवढे गरीब आहेत, त्या

प्रसिद्ध अभिनेत्रीला अश्लील फोटो, Video पाठवून मानसिक त्रास, आरोपीला अटक, काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर...

नवी दिल्ली : प्रख्यात टीव्ही अभिनेत्रीला फेसबुकवर वारंवार अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्याबद्दल ऑनलाइन छळाची

८वा वेतन आयोग मंजूर पण सरकारी कर्मचारी धास्तावले; कारण काय?

केंद्राचा मोठा निर्णय: पगारवाढीऐवजी आता 'कामकाजावर' वेतन! नवी दिल्ली : देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि

Rahul Gandhi : "मतदान वेळी आक्षेप घेतला नाही आणि आता २५ लाख बोगस मतदारांचा आरोप!" राहुल गांधींच्या आरोपांवर आयोगाचं थेट आव्हान!

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्राप्रमाणेच (Maharashtra) हरियाणा विधानसभा निवडणुकीतही (Haryana Assembly

‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मारवाडी मानसिकता थांबवू शकते’

आयसीएआर-सेंट्रल अॅरिड झोन रिसर्चचे संचालक डॉ. तंवर यांचे भाष्य जोधपूर : ऐतिहासिकदृष्ट्या राजस्थान आणि

‘वंदे भारत’साठी जोधपूरमध्ये पहिला देखभाल डेपो

मेंटेनन्सचा विषय निकाली; दिल्ली, मुंबई, बंगळूरुमध्येही होणार उभारणी जोधपूर  : जलद गतीने धावणारी वंदे भारत