Ajit Agarkar : निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी आगरकरचे नाव आघाडीवर?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून १० विकेट्सने झालेला लाजिरवाणा पराभव बीसीसीआयच्या जिव्हारी लागला. (Ajit Agarkar) बीसीसीआयने शुक्रवारी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समिती बरखास्त केली.


बीसीसीसीआयने नव्या निवड समितीसाठी तातडीने अर्ज मागवले आहेत. चेतन शर्मा यांच्यानंतर निवड समितीचा नवा अध्यक्ष कोण? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. निवड समितीच्या शर्यतीत भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.


चेतन शर्मा यांच्यानंतर आता अजित आगरकर निवड समितीचा नवा अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. याआधीही अजित आगरकरने निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यावेळी त्याला यश मिळू शकले नाही. परंतु, यंदा अजित आगरकर याचीच निवड समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "अजित आगरकरशी अद्याप याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. परंतु त्याला या पदासाठी अर्ज करायचा आहे. ती त्याची निवड आहे. मागच्या वेळीही थोडक्यात त्याचे अध्यक्षपद गेले होते", अशी माहिती एका इंग्रजी वाहिनीने आपल्या वृत्तात दिली आहे.



Table Tennis : मनिका बत्राची ऐतिहासिक कांस्य कमाई


अजित आगरकरने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने भारतासाठी २६ कसोटी, १९१ एकदिवसीय आणि ६२ टी-२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजित आगरकरने २८८ विकेट्स घेतले आहेत. तर, कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ५८ विकेट्सची नोंद आहे. याशिवाय, टी-२० क्रिकेटमध्ये त्याला ४७ विकेट्स मिळाले आहेत.

Comments
Add Comment

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर