Ajit Agarkar : निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी आगरकरचे नाव आघाडीवर?

  164

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून १० विकेट्सने झालेला लाजिरवाणा पराभव बीसीसीआयच्या जिव्हारी लागला. (Ajit Agarkar) बीसीसीआयने शुक्रवारी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समिती बरखास्त केली.


बीसीसीसीआयने नव्या निवड समितीसाठी तातडीने अर्ज मागवले आहेत. चेतन शर्मा यांच्यानंतर निवड समितीचा नवा अध्यक्ष कोण? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. निवड समितीच्या शर्यतीत भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.


चेतन शर्मा यांच्यानंतर आता अजित आगरकर निवड समितीचा नवा अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. याआधीही अजित आगरकरने निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यावेळी त्याला यश मिळू शकले नाही. परंतु, यंदा अजित आगरकर याचीच निवड समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "अजित आगरकरशी अद्याप याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. परंतु त्याला या पदासाठी अर्ज करायचा आहे. ती त्याची निवड आहे. मागच्या वेळीही थोडक्यात त्याचे अध्यक्षपद गेले होते", अशी माहिती एका इंग्रजी वाहिनीने आपल्या वृत्तात दिली आहे.



Table Tennis : मनिका बत्राची ऐतिहासिक कांस्य कमाई


अजित आगरकरने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने भारतासाठी २६ कसोटी, १९१ एकदिवसीय आणि ६२ टी-२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजित आगरकरने २८८ विकेट्स घेतले आहेत. तर, कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ५८ विकेट्सची नोंद आहे. याशिवाय, टी-२० क्रिकेटमध्ये त्याला ४७ विकेट्स मिळाले आहेत.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट