North India : उत्तर भारतात थंडीची लाट पसरणार

शिमला (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात (North India) थंडीची लाट पसरणार आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व काश्मीर खोऱ्यातील ताज्या बर्फवृष्टीनंतर संपूर्ण उत्तर भारतात 'कोल्ड अटॅक' होणार आहे. दुसरीकडे लाहौल स्पीतिच्या केलोंगचे किमान तापमान उणे ६.९ अंशांपर्यंत घसरले आहे.


हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील आठवड्यापासून चंदीगड, पंजाब, हरियाणा, दिल्ली व उत्तर प्रदेशात धुक्याचे साम्राज्य पसरेल. पर्वतरांगांतील बर्फाळ हवेमुळे मैदानी भागात थंडी वाढण्यास सुरुवात होईल.


शेजारच्या पंजाबमधील अमृतसरमध्येही कमाल तापमानात ८ अंश सेल्सिअसची घट नोंदवण्यात आली. येथे किमान तापमान ११.९ डिग्री व कमाल तापमान १९.८ डिग्री नोंदवण्यात आले. चंदीगडच्या कमाल तापमानात ४ डिग्रीची घट झाल्यानंतर २३.९ व किमान तापमान १४.२ डिग्री नोंदवण्यात आले. अंबाला, लुधियाना, पटियाला, हिसार व जयपूरच्या तापमानातही १ ते ४ डिग्रीची घट नोंदवण्यात आली.


हवामान केंद्र शिमलाचे संचालक सुरेंद्र पाल यांनी सांगितले की, डोंगरावरील ताज्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात धुके पसरल्यामुळे दृश्यमानता कमी होईल. उत्तर भारतातील बहुतांश शहरातील किमान तापमान १० डिग्रीच्या खाली घसरू शकते. धुकेही पसरू शकते.


हिमाचलच्या मनाली, नारकंडा, शिकारी देवी व बिजली महादेवमध्ये मागील २४ तासांत या हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. तर मैदानी भागांत हिवाळ्यातील पहिला पाऊस झाला आहे. गत ४८ तासांत लाहौल स्पीतिच्या कुकुमसेरीत सर्वाधिक २४ सेमी, कोकसरमध्ये २२ सेमी, केलोंगमध्ये १५ सेमी, गोंदलात १३ सेमी व खदरालामध्ये ३ सेमी बर्फवृष्टी झाली आहे. दुसरीकडे, उत्तराखंड व काश्मीर खोऱ्यातही बर्फवृष्टी सुरू आहे. गुलमर्गसह खोऱ्यातील अनेक भागांतील तापमान सध्या मायनसमध्ये गेले आहे.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने