प्रहार    

North India : उत्तर भारतात थंडीची लाट पसरणार

  179

शिमला (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात (North India) थंडीची लाट पसरणार आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व काश्मीर खोऱ्यातील ताज्या बर्फवृष्टीनंतर संपूर्ण उत्तर भारतात 'कोल्ड अटॅक' होणार आहे. दुसरीकडे लाहौल स्पीतिच्या केलोंगचे किमान तापमान उणे ६.९ अंशांपर्यंत घसरले आहे.


हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील आठवड्यापासून चंदीगड, पंजाब, हरियाणा, दिल्ली व उत्तर प्रदेशात धुक्याचे साम्राज्य पसरेल. पर्वतरांगांतील बर्फाळ हवेमुळे मैदानी भागात थंडी वाढण्यास सुरुवात होईल.


शेजारच्या पंजाबमधील अमृतसरमध्येही कमाल तापमानात ८ अंश सेल्सिअसची घट नोंदवण्यात आली. येथे किमान तापमान ११.९ डिग्री व कमाल तापमान १९.८ डिग्री नोंदवण्यात आले. चंदीगडच्या कमाल तापमानात ४ डिग्रीची घट झाल्यानंतर २३.९ व किमान तापमान १४.२ डिग्री नोंदवण्यात आले. अंबाला, लुधियाना, पटियाला, हिसार व जयपूरच्या तापमानातही १ ते ४ डिग्रीची घट नोंदवण्यात आली.


हवामान केंद्र शिमलाचे संचालक सुरेंद्र पाल यांनी सांगितले की, डोंगरावरील ताज्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात धुके पसरल्यामुळे दृश्यमानता कमी होईल. उत्तर भारतातील बहुतांश शहरातील किमान तापमान १० डिग्रीच्या खाली घसरू शकते. धुकेही पसरू शकते.


हिमाचलच्या मनाली, नारकंडा, शिकारी देवी व बिजली महादेवमध्ये मागील २४ तासांत या हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. तर मैदानी भागांत हिवाळ्यातील पहिला पाऊस झाला आहे. गत ४८ तासांत लाहौल स्पीतिच्या कुकुमसेरीत सर्वाधिक २४ सेमी, कोकसरमध्ये २२ सेमी, केलोंगमध्ये १५ सेमी, गोंदलात १३ सेमी व खदरालामध्ये ३ सेमी बर्फवृष्टी झाली आहे. दुसरीकडे, उत्तराखंड व काश्मीर खोऱ्यातही बर्फवृष्टी सुरू आहे. गुलमर्गसह खोऱ्यातील अनेक भागांतील तापमान सध्या मायनसमध्ये गेले आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींच्या वकिलांचा यु-टर्न: “जीवाला धोका” म्हणणारा अर्ज परत घेणार

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुणे येथील न्यायालयात गांधींना वादी

तुमचे ICICI बँकमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची...

आयसीआयसीआय बँकेचा यूटर्न, बचत खात्यांसाठी किमान शिल्लक मर्यादा केली कमी मुंबई: आयसीआयसीआय बँकेने नुकतीच नवीन

चीनचे परराष्ट्र मंत्री पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकन प्रशासनाद्वारे ५० टक्के टॅरिफ लागू करण्यात आल्यावर, चीन आणि

महाराष्ट्रातील १५ सरपंच स्वातंत्र्यदिनी दिल्लीत विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

९ महिला सरपंचांचा समावेश नवी दिल्ली : राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी

Minta Devi: काँग्रेसची पोलखोल! बिहारमधील '१२४ वर्षीय' मिंटा देवी कॅमेऱ्यासमोर आल्या, काय म्हणाल्या पहा...

बिहार: बिहारमध्ये राहणाऱ्या मिंटा देवीचा फोटो आणि नावाचा वापर करून काँग्रेसने मंगळवारी आंदोलन केले होते. या

Stray Dog Shelter : कुत्र्यांमुळे मृत्यू झालेल्यांना परत आणणार आहात का? सुप्रीम कोर्टाने प्राणीप्रेमींना धरले फैलावर; काय आहेत कोर्टाचे कडक आदेश?

नवी दिल्ली : मुंबईत कबुतरखान्यावरून सुरू असलेला वाद थंड पडलेला नाही, तसेच दुसरीकडे दिल्ली-एनसीआरमध्ये भटक्या