Raj Thackeray : काम करायचं नसेल तर पदं सोडा

  170

मुंबई : तुम्हाला पक्षाचे काम करायचे नसेल तर पद सोडा आणि चालते व्हा, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांना दिला आहे.


मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपला संताप व्यक्त केला.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. तुम्हाला निट काम करायचे नसेल तर पदावर कशाला राहाता? पदावरुन दूर व्हा, अशा शब्दांत त्यांनी पदाधिका-यांना खडसावले.


विभागीय पातळीवर जे पदाधिकारी पक्षाचे काम करत नाहीत, त्यांची यादी बनवण्याचे आदेश राज ठाकरेंनी विभाग प्रमुखांना दिले आहेत. आगामी काळामध्ये सर्वांनीच कामामध्ये सुधारणा करा, लोकांपर्यंत जावून कामे करा, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.


पुढील महिन्यापासून राज ठाकरे दौऱ्यावर निघणार आहेत. सुरुवातीला ते कोकण विभागाचा दौरा करतील. त्यानंतर ते विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते जिल्हा आणि तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचे समजते.


अन्य महत्वाच्या बातम्या...

Molestation : विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा


Ashish Shelar : जितेंद्र आव्हाड वेडेचाळे करतायेत: आशिष शेलार

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र