students : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनो, जरा लक्ष द्या!

औरंगाबाद (प्रतिनिधी) : दहावी आणि बारावीच्या परिक्षेतील नियमात काही बदल करण्यात आले असून यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी होम सेंटर असणार नाही. तसेच कोरोनामुळे मागच्या वर्षीच्या दिलेला वाढीव वेळही रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचा (students) वेळेच्या आतच पेपर लिहावा लागणार आहे.


कोरोना काळात विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना होम सेंटर आणि पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ दिला होता. ८० गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास आणि ६० व ४० गुणांसाठी असलेली अधिकची पंधरा मिनिटांची सवलत यंदा होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार नाही. मात्र, दिव्यागांना मिळणारी सवलत कायम राहणार आहे, असे औरंगाबाद बोर्डाने स्पष्ट केले आहे.


गेल्या वर्षी २५ टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला होता. मात्र, यंदा १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. बारावीचे अर्ज भरण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत १ लाख ४८ हजार ६३६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. दहावीसाठी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून ९५ हजार ६८२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यंदा परिस्थिती सुधारली असून, सर्व शाळा नियमित सुरळीत सुरू असल्याने देण्यात आलेल्या सुविधांची सूट रद्द करण्यात आली आहे.



हे सुद्धा वाचा...


solar energy : सौरऊर्जेच्या वापराने ३२० अब्ज रुपयांची बचत

Comments
Add Comment

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आता दहा पदरी! 'एमएसआरडीसी' लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणात सरासरी ११.१ टक्के वाढ

ठाणे : नागरिकांनी याही वर्षी दिवाळी सण उत्साहाने साजरा केला असून याकाळात फटाके वाजण्याच्या प्रमाणातही वाढ

‘संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख’

नागपूर : सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी नागपूर येथे विस्तार करीत आहे. या

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींची नाराजी दूर, ७० लाख महिलांच्या अपात्रतेची भीती टळली; e-KYCच्या ‘त्या’ निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती

मुंबई : राज्यातील महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पुन्हा एकदा

लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’ला ब्रेक; ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता

मुख्यमंत्री शनिवारी जाणार नाशिक दौऱ्यावर

नाशिक : अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ३८ वे अधिवेशन शनिवार, दि. २५ ते रविवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आयोजित