Categories: रायगड

उरण तालुक्यात झालाय भूमाफियांचा सुळसुळाट

Share

उरण (वार्ताहर) : उरण तालुक्यात भूखंडमाफियांनी पुन्हा फणा उगारला आहे. राजकीय मंडळी आणि प्रशासन अशा मंडळींची पाठराखण करीत असल्याचा सामान्य नागरिकांचा आक्षेप आहे. स्थानिक शेतकरी आणि नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गावी गेलेल्यांच्या जमिनी गिळंकृत करणारी मोठी यंत्रणा खेड तालुक्यात कार्यरत आहे. यामुळे आयुष्यभर सांभाळलेल्या जमिनींवर पाणी सोडण्याची वेळ अनेकांवर आली आहे. तरी शेतकऱ्यांनी अशा फसव्या भूमाफियांच्या आमिषाला बळी पडू नये.

उरण तालुक्यात जमिनींना सोन्यापेक्षाही जास्त भाव आल्याने भूखंडमाफियांची नेहमीच मोक्याच्या जागांवर वक्रदृष्टी राहिली आहे. गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनींचे प्रशासनाला हाताशी धरून खोटे वाद निर्माण करून त्यांना हतबल करण्याचे फंडे तालुक्यात वापरले जात आहेत. संबंधितांचे राजकीय लागेबांधे झुगारून भूमाफियांचा बीमोड करण्याची गरज निर्माण झाली आहे.

राजकीय पाठबळ असलेल्यांकडून भूखंडमाफियांच्या मदतीने जागा बळकाविण्याचे सत्र सुरू आहे. यासाठी राजकीय पाठबळ असलेले गुंडगिरी करणारे अनेक जण लहान-मोठ्या गुंडांना सांभाळतात. अशा लोकांच्या टोळ्या दररोज शहरातील जमिनींची माहिती काढणे, त्यातील लोकांना धमकावणे, जमिनीवर सरळ पाट्या ठोकणे, या उद्योगांमध्ये गुंतलेले असतात. या लोकांना कोणत्या ठिकाणी कोणता गट नंबर आहे, त्यावर मालकी कुणाची आहे, याची संपूर्ण माहिती असते.

जागा बळकाविण्यासाठी काही दिवस लागतात. एकदा वाद निर्माण केला, की त्यांचे बरेच काम हलके होते. वाद निर्माण करण्यापर्यंत बराच कालावधी लागतो. खोटे वाद तालुका प्रशासनासमोर दाखल होतात. प्रशासन आणि पोलिस ठाण्याचा आधार घेऊन मूळ मालकांना त्रस्त केले जात आहे. बळाचा वापर करून मूळ मालकाला त्रास दिला जात आहे. या प्रकारामुळे जागेचा मूळ मालक हतबल होतो. उरण तालुक्यात ग्रामीण भागात अशी शेकडो प्रकरणे वादग्रस्त आहेत. नुकतीच सिडकोने उर्वरित भागातील जागा संपादित करण्याची अधिसूचना जाहीर केली आहे. त्याची कुणकुण आधीच लागताच उरणमधील शासकीय अधिकारी, राजकीय व सामाजिक प्रतिनिधी बरोबर स्थानिक दलाल परिसरात कार्यरत असून त्यांनी करोडो रुपयांची जमीन खरेदी केल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते.

उरणमधील काही शासकीय अधिकारी तर कार्यालयात कमी तर जमिनीची दलाली करण्यासाठी जास्त वेळ देत आहेत. उरणमधील राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी एकत्र येऊन फर्म स्थापन करून जमिनीचे व्यवहार करण्यात ते मग्न झाले आहेत. काहींनी शेतकऱ्यांशी व्यवहार करून दिलेले चेक बाऊन्स होऊनही जमिनीचे सातबारे स्वतःच्या नावावर केल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकर्यांची फसवणूक झाली परंतु न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आर्थिक कुवत नसल्याने गप्प रहाण्याची वेळ आली आहे. तरी शेतकऱ्यांनी अशा भुलभुलय्या दलालांच्या आमिषाला बळी पडू नये. अन्यथा नंतर डोक्याला हात लावून हताशपणे सहन करण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही.

Recent Posts

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

3 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

29 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

1 hour ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

2 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

2 hours ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

2 hours ago