रायगड जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

५ वर्षांत १ हजार १७४ अत्याचाराचे गुन्हे


सुभाष म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२५ या ५ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात महिला शारीरिक अत्याचाराचे ५०८ व विनयभंगाचे ६६६ असे १ हजार १७४ गुन्हे दाखल झाले आहेत. बलात्कार व विनयभंगाच्या गुन्ह्यांवर नजर टाकल्यास जिल्ह्यातील महिला सुरक्षित नसल्याचे सत्य समोर येत आहे. रायगड जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


रायगड जिल्ह्यात महिला सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जिल्ह्यात बलात्कार व विनयभंगाचे गुन्हे वाढले असून, दर आठवड्याला सरासरी चार ते पाच महिला या गुन्ह्यांना बळी पडत आहेत. या गुन्ह्यांची उकल करून आरोपींना गजाआड करण्यात यश आल्याचे पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले असून, ९८.८० टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.


बाजारात गर्दीच्या ठिकाणी, प्रवासात महिला प्रवाशांशी अंगलट, अल्पवयीन विद्यार्थिनींशी चाळे, महाविद्यालय आवारात छेडखानी, नको तिथे स्पर्श करून लज्जा उत्पन्न करणारे कृत्य असे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतात, तर लग्नाचे अामिष दाखवून, नोकरीत बढती देण्याचे अामिष तसेच इतर प्रकारे शारीरिक संबंध प्रस्तापित करून तक्रारीही दाखल होत आहेत. पूर्वी अत्याचाराला बळी पडलेल्या महिला बदनामीला घाबरून गप्प बसत असत. आता महिला आपल्यावरील अत्याचाराविरोधात आवाज उठवू लागल्या आहेत.


महिला सुरक्षिततेसाठी दामिनी पथक : रायगड जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाने महिला पोलिसांच्या दामिनी पथकाची निर्मिती केली आहे. त्यांना मोटारसायकल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पथकाला विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, समुद्र किनारे आणि गर्दीच्या ठिकाणी या पथकाची नियमित गस्त सुरू असते. या पथकांचे नंबर शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांना उपलब्ध करून दिले असून, या नंबरवर संपर्क साधल्यास अवघ्या काही मिनिटांत दामिनी पथक घटनास्थळी दाखल होऊ शकेल अशी व्यवस्था आहे. मात्र एवढे प्रयत्न करूनही महिलांसंबंधी गुन्हे कमी झाले नसल्याचे चित्र दाखल गुन्ह्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर दिसून येते.

Comments
Add Comment

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला डच्चू देणार, T20 क्रिकेटसाठी नवा कर्णधार शोधणार ?

मुंबई : बीसीसीआयची निवड समिती आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून सूर्यकुमार यादवला कायमचा डच्चू देण्याचा

Hareshwar Patil : माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे बुधवारी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते

Nale Safai : रेल्वे, BMC, लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून साधणार नालेसफाई

उपमहापौर संजय घाडी यांनी केली कुर्ला भागातील नाल्यांची सफाई मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे हद्दीतील

Wipro: टीसीएसनंतर विप्रोमध्येही कॉर्पोरेट जिहाद

पुणे : नाशिक येथील 'टीसीएस' आणि मुंबईतील 'एसबीआय' बँकिंग क्षेत्रातील वादग्रस्त प्रकरणांनंतर आता पुण्याच्या

Anti-hand kiln campaign : हातभट्टी विरोधी मोहिमेला वेग; दीड कोटीचा मुद्देमाल जप्त

मुंबई: मागील आठवड्यात पुणे शहरामध्ये घडलेल्या विषारी दारु दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध अवैध हातभट्टी

Pune Crime : नसरापूर प्रकरणी न्यायालयात तीन लहान मुलांची साक्ष

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणाच्या खटल्यात एक मोठी घडामोडी