वसई कोळी वाड्यात धोकादायक विकासकाम सुरु!

विरार (प्रतिनिधी) : वसई 'आय' प्रभागमधील कोळीवाडा येथील पालिकेच्या भूमिगत गटाराचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरु आहे. याबरोबरच करण्यात आलेले खोदकाम लगतच्या इमारतीसाठी धोकादायक ठरत आहे. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. असे असतानाही पालिकेचे अभियंता प्रकाश साटम 'नॉट रिचेबल' झाले आहेत.


वसई कोळीवाडा येथील मुख्य रस्ता खोदुन पालिकेने मोठ्या गटाराचे बांधकाम सुरू केले आहे. यासाठी १५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कंत्राटदाराने कुठलीच नियमावली न पाळता खोदकाम केले. बांधकाम करताना पीसीसी वरती ६ इंच कोटिंग करणे गरजेचे असताना ती करण्यात आलेली नाही. पालिका अभियंता, अधिकारी जागेवर नसताना हे बांधकाम घाईने करण्याकडे कंत्राटदाराचा कल आहे. याकरता रात्री बांधकाम उरकण्यात येत आहे. या बांधकामा लगत जीर्ण झालेल्या, लोड बेरिंग असलेल्या इमारती आहेत. त्यांच सर्वेक्षण न करताच भलमोठे खोदकाम केल्याने नजिकच्या इमारतीना तडे पडायला सुरुवात झाली आहे.


दुर्दैवाने सदर इमारती कोसळल्या व त्यात जीवित, वित्तहानी झाली तर पालिका प्रशासन त्याची जबाबदारी घेणार का? असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. सदर काम तत्काळ थांबवून पंचनामा करणे गरजेचे आहे. शिवाय गरज भासल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया करणे गरजेचे आहे.


आय प्रभागचे अभियंता प्रकाश साटम यांना याची विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता २ दिवसांपासून फोन नॉट रिचेबल असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अशा अधिकारी वर्गामुळे करदात्या नागरिकांचे पैसे अशा विकास कामामुळे वाया जाणार असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. शिवाय नागरिकांचे जीव धोक्यात असतानाही उपाययोजना केली जात नाही. याबाबत पालिकेचे मुख्य अभियंता राजेंद्र लाड यांना याबाबत कल्पना दिली असता, त्यांनी सदर विकास कामाची पहाणी करून दोषी विरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती दिली.

Comments
Add Comment

ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे भाव घसरले, कांदा उत्पादक हवालदिल

लासलगाव : ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले

वाढवण बंदराविरोधातील स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

 वाढवण बंदराच्या नियोजित विकासाला स्थगिती देण्याची स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने

वसई-विरारमध्ये ऑटोरिक्षा-टॅक्सींसाठी मीटर बंधनकारक

१५ नोव्हेंबरनंतर मीटरशिवाय भाडे घेतल्यास थेट कारवाई. मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय; ठाणे, कल्याणसाठी

गारगाई पाणी प्रकल्पामुळे सहा गावे बाधित, तब्बल ४०० हेक्टर जमिनींचे केले जाणार सीमांकन

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदी

विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा खंडित; लोकल थांबल्याने प्रवाशांची गैरसोय

सफाळे : पश्चिम रेल्वेच्या विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने रेल्वेसेवा

जव्हार शहरातील १२ अंगणवाडी केंद्रांवर लसीकरण ठप्प

जव्हार शहरातील तब्बल १२ अंगणवाडी केंद्रांवरील गरोदर माता आणि बालकांसाठी सुरू असलेले लसीकरण व आरोग्य तपासणीचे