वसई कोळी वाड्यात धोकादायक विकासकाम सुरु!

विरार (प्रतिनिधी) : वसई 'आय' प्रभागमधील कोळीवाडा येथील पालिकेच्या भूमिगत गटाराचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरु आहे. याबरोबरच करण्यात आलेले खोदकाम लगतच्या इमारतीसाठी धोकादायक ठरत आहे. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. असे असतानाही पालिकेचे अभियंता प्रकाश साटम 'नॉट रिचेबल' झाले आहेत.


वसई कोळीवाडा येथील मुख्य रस्ता खोदुन पालिकेने मोठ्या गटाराचे बांधकाम सुरू केले आहे. यासाठी १५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कंत्राटदाराने कुठलीच नियमावली न पाळता खोदकाम केले. बांधकाम करताना पीसीसी वरती ६ इंच कोटिंग करणे गरजेचे असताना ती करण्यात आलेली नाही. पालिका अभियंता, अधिकारी जागेवर नसताना हे बांधकाम घाईने करण्याकडे कंत्राटदाराचा कल आहे. याकरता रात्री बांधकाम उरकण्यात येत आहे. या बांधकामा लगत जीर्ण झालेल्या, लोड बेरिंग असलेल्या इमारती आहेत. त्यांच सर्वेक्षण न करताच भलमोठे खोदकाम केल्याने नजिकच्या इमारतीना तडे पडायला सुरुवात झाली आहे.


दुर्दैवाने सदर इमारती कोसळल्या व त्यात जीवित, वित्तहानी झाली तर पालिका प्रशासन त्याची जबाबदारी घेणार का? असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. सदर काम तत्काळ थांबवून पंचनामा करणे गरजेचे आहे. शिवाय गरज भासल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया करणे गरजेचे आहे.


आय प्रभागचे अभियंता प्रकाश साटम यांना याची विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता २ दिवसांपासून फोन नॉट रिचेबल असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अशा अधिकारी वर्गामुळे करदात्या नागरिकांचे पैसे अशा विकास कामामुळे वाया जाणार असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. शिवाय नागरिकांचे जीव धोक्यात असतानाही उपाययोजना केली जात नाही. याबाबत पालिकेचे मुख्य अभियंता राजेंद्र लाड यांना याबाबत कल्पना दिली असता, त्यांनी सदर विकास कामाची पहाणी करून दोषी विरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती दिली.

Comments
Add Comment

नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार