तालिबान सरकारचे महिलांवर कठोर निर्बंध

अफगाणिस्तान (वृत्तसंस्था) : तालिबान सरकार सत्तेत आल्यापासून महिलांवर अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. अफगाणिस्तानातील तालिबान सरकार महिलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.


अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आल्यानंतर तेथील परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होताना पाहायला मिळत आहे. तालिबान सरकार सत्तेत आल्यापासून अफगाणिस्तानी महिलांचे आयुष्य कठीण झाले आहे. तालिबानकडून महिलांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र, महिला त्यांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढत आहेत. तालिबानने महिलांच्या शिक्षणावर बंदी घातली आहे. त्यामुळे तेथील तरुणी आणि महिलांनी त्यांच्या शिक्षणाच्या हक्कांसाठी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलक तरुणींना तालिबान्यांकडून मारहाण केली जात आहे.


अफगाणिस्तानातील तालिबान सरकार महिलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना रोखण्यासाठी तरुणींना मारहाण करण्यासही मागेपुढे पाहत नाही. ईशान्य अफगाणिस्तानमधील एका विद्यापीठात विद्यार्थिनींना बुरखा घालण्याची सक्ती करण्यात आली. तालिबान सत्तेवर आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या हक्कांवर दडपशाही सुरू आहे. महिलांना शिक्षण घेण्यापासून रोखले जात आहे. महिलांच्या नोकरी करण्यास बंदी घातली जात आहे. तालिबानमधील महिलांची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून सरकारची दडपशाही दिसून येत आहे.

Comments
Add Comment

भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था!

नवी दिल्ली : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

'एलपीजी सबसिडी'चे सूत्र बदलणार

केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत! नवी दिल्ली : केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीच्या मोजणीत

भारतात मिळतेय बनावट रेबीज लस

दरवर्षी २० हजार लोकांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियाचा इशारा नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये लसीकरणासाठी काम करणाऱ्या

दूषित पाण्यामुळे इंदूरमध्ये ८ जणांचा मृत्यू

११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने