कल्याण (वार्ताहर) : २० वर्षांखालील आशियाई कप रग्बी स्पर्धा ताशकंद, उझबेकिस्थान येथे दिनांक ५ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील २ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ह्या स्पर्धेकरिता ५ ऑक्टोबरपासून २० वर्षांखालील भारतीय रग्बी संघाचे सराव शिबीर भुवनेश्वर, ओडिशा येथे सुरू होते.
देशभरातून ४० खेळाडूंची या सराव शिबिरामध्ये निवड करण्यात आली होती. ह्या सराव शिबिरातून भारताचा अंतिम संघ निवडण्यात आला. या अंतिम संघात ठाणे जिल्ह्यातील रग्बी खेळाडू दिवेश देवडिगा व निशांत चौहान यांची भारतीय रग्बी संघात निवड करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा सचिव प्रमोद पारसी व खजिनदार यदनेश्वर बागराव यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…