औरंगाबाद : दिवाळीच्या सणाला गालबोट लावणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. औरंगाबाद येथे फटाके फोडताना झालेल्या दुर्घटनेतील जखमींचा आकडा आता वाढला असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ मुलांच्या डोळ्याला आणि चेह-याला इजा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
फटाके फोडताना या मुलांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे या सर्व १६ मुलांना उपचारासाठी जिल्ह्यातील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान या सर्व मुलांवर उपचार करुन त्यांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या मुलांच्या डोळ्यांना, हातांना आणि चेह-याला इजा झाल्याची माहिती घाटी रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. यामध्ये एका १० वर्षाच्या मुलाला गंभीर इजा झाली होती. त्याच्यावर उपचार करुन मंगळवारी सकाळी त्याला घरी पाठवण्यात आले.
तसेच चिखटणा परिसरात देखील एका चार वर्षांच्या मुलीला फटाके फोडताना इजा झाली होती. तिच्यावर देखील परिसरातील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान इतर मुलांना किरकोळ इजा झाल्या असून त्यांना देखील उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे फटाके फोडताना पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…