वाड्यात पराभूत उमेदवारांनी फोडल्या पाण्याच्या टाक्या

वाडा (वार्ताहर) : तालुक्यात सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर गाव पाड्यांवर `कही खुशी कही गमʼ पाहायला मिळाले. विजयी झालेल्या उमेदवारांकडून निघालेल्या मिरवणुकी दरम्यान काही ठिकाणी बाचाबाची झाली. तर दिनकरपाडा येथील काही अज्ञात व्यक्तीकडून ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेच्या पाण्याच्या दोन टाक्या फोडून संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेचा गावातील महिलांनी निषेध व्यक्त केला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


नूकताचा वाडा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला. यामध्ये भाजपची सरशी झाल्याचे दिसून आले. तर अनेक जणांच्या पदरी निराशा आली. यामध्ये काही जणांकडून संबंधित हार पचवता आली नसल्याने त्याचा राग सरकारी मालमत्तेवर काढण्यात आला. दिनकर पाडा येथील पाण्याच्या टाक्या फोडून आपला संताप व्यक्त करण्यात आला. कोंढले ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन झाल्याने प्रस्तावितांना पराभव पचवता आला नसल्याने जाणूनबुजून हा प्रकार केला असल्याचा आरोप दिनकरपाडा गावातील महिलांनी केला आहे. या घटनेने ग्रामपंचायतीच्या मालमत्तेची मोठी हानी झाली आहे. विघ्नसंतुष्ट लोकांच्या या कृत्यामूळे महिलांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.


दिनकरपाडा गावातील पाण्याच्या टक्क्यांच्या दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर करून महिलांना तत्काल पाणी दिले जाईल. शिवाय अज्ञात व्यक्ती विरोधात वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. -प्रकाश पाटील, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कोंढले.

Comments
Add Comment

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील

वसई विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास गती

विरार, विराट नगर, ओस्वालनगरी नालासोपारा, अलकापुरी, उमेळमान या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन मुंबई : वसई

वसईत बर्डपार्क उभारण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक सरसावले!

मुंबई : वसई विरार महापालिकेच्या हद्दीत बर्ड पार्क उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या पार्कमध्ये पक्षांना

एक हजार रुपयांच्या मोबदल्यात ६ वर्षाच्या बालकाला जुंपले कामाला !

जिल्ह्यातील आदिवासी कातकरी मुलांचे बालमजुरीसाठी शोषण आजही सुरुच पालघर : पालघर जिल्ह्यातील आदिवासी कातकरी

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी ६८ कोटींचा खर्च

विरार : वसई - विरार पालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यांच्या

नालासोपारा ड्रग्ज कारखाना प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

वसई : मुंबई पोलिसांनी कारवाई करत नालासोपारा येथे ड्रग्जचा अवैध ड्रग्जचा कारखाना उघडकीस आणला. या कारवाईनंतर