वाड्यात पराभूत उमेदवारांनी फोडल्या पाण्याच्या टाक्या

  99

वाडा (वार्ताहर) : तालुक्यात सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर गाव पाड्यांवर `कही खुशी कही गमʼ पाहायला मिळाले. विजयी झालेल्या उमेदवारांकडून निघालेल्या मिरवणुकी दरम्यान काही ठिकाणी बाचाबाची झाली. तर दिनकरपाडा येथील काही अज्ञात व्यक्तीकडून ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेच्या पाण्याच्या दोन टाक्या फोडून संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेचा गावातील महिलांनी निषेध व्यक्त केला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


नूकताचा वाडा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला. यामध्ये भाजपची सरशी झाल्याचे दिसून आले. तर अनेक जणांच्या पदरी निराशा आली. यामध्ये काही जणांकडून संबंधित हार पचवता आली नसल्याने त्याचा राग सरकारी मालमत्तेवर काढण्यात आला. दिनकर पाडा येथील पाण्याच्या टाक्या फोडून आपला संताप व्यक्त करण्यात आला. कोंढले ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन झाल्याने प्रस्तावितांना पराभव पचवता आला नसल्याने जाणूनबुजून हा प्रकार केला असल्याचा आरोप दिनकरपाडा गावातील महिलांनी केला आहे. या घटनेने ग्रामपंचायतीच्या मालमत्तेची मोठी हानी झाली आहे. विघ्नसंतुष्ट लोकांच्या या कृत्यामूळे महिलांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.


दिनकरपाडा गावातील पाण्याच्या टक्क्यांच्या दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर करून महिलांना तत्काल पाणी दिले जाईल. शिवाय अज्ञात व्यक्ती विरोधात वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. -प्रकाश पाटील, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कोंढले.

Comments
Add Comment

मनपा क्षेत्रातील ११७ शाळा जिल्हा परिषदेकडेच !

आमदारांनी वेधले सभागृहाचे लक्ष विरार : वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ११७ जिल्हा

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

न्यू इंग्लिश स्कूल सोनाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू

वाडा : वाडा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सोनाळे या विद्यालयात एका पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गेल्या दि.

४०० खाटांच्या हॉस्पिटलसाठी सातबाऱ्याचा अडसर!

२५ कोटींचा निधी डीपीसीकडे पडून विरार : नालासोपारा मौजे आचोळे, येथे प्रस्तावित असलेल्या ४०० खाटांच्या

वसई -विरार शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य

कचराकुंडीत कचरा जमा करण्याचे पालिकेकडून आवाहन वसई : वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. वाढते

घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटदारांची स्पर्धा

कंत्राटासाठी पहिल्यांदाच ४६ निविदा  विरार : वसई-विरार पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्याने मागविण्यात