मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना राजीनाम्याच्या जंजाळात अडकवून विश्वनाथ महाडेश्वरांना उमेदवारी देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.
लटकेंच्या उमेदवारीवरून काल रात्री उशिरापर्यंत मातोश्रीवर खलबते झाल्याचे समजते. या बैठकीला स्वत: लटके उपस्थित नव्हत्या. मात्र, ठाकरे गटाकडून लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही, तर मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, प्रमोद सावंत आणि कमलेश राय यांच्याही नावाची चर्चा झाल्याचे समजते. तर भाजपने मुरजी पटेल यांना रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी याबाबत एक ट्विट करून अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. त्या ट्विटमध्ये चव्हाण म्हणतात की, मुळात लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकऊन अंधेरीची उमेदवारी विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अनिल परब यांचा डाव आहे. लटके वहिनींनी तो ओळखावा इतकच…, असे आवाहन त्यांनी आपल्या ट्विटमधून केले आहे.
अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही निवडणूक होत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या १४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. ३ नोव्हेंबरला मतदान तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
उत्तर प्रदेश: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने देशातील सर्व…
नवी दिल्ली: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त (Rahul Gandhi Controversial Statement on Savarkar)…
बंगळुरू : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे शुक्रवार २५ एप्रिल…
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…
पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…