मराठी पाट्यांकरिता पालिकेची तपासणी सुरू

  81

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेकडून दुकाने आणि आस्थापनांवरील पाट्यांची पाहणी करायला सुरवात झाली आहे. सोमवार १० ऑक्टोबर रोजी २ हजार १५८ दुकानांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. या पैकी १ हजार ६३६ दुकाने, आस्थापनांवर मराठीत पाट्या बसवण्यात आल्या आहेत. ५२२ दुकाने, आस्थापनांवर अद्यापही मराठी पाट्या नाहीत.


मुंबई महापालिकेने दुकाने आणि आस्थापानांवर मराठी पाट्या नसलेल्या मालकांवर कारवाई केली जाणार असून सुरुवातीला पालिकेकडून दुकानांची पाहणी सुरू झाली आहे. सोमवार १० ऑक्टोबरपासून पालिकेने दुकानांच्या पाट्यांची तपासणी करण्यास सुरवात केली असून सोमवारपर्यंत एकूण २ हजार १५८ दुकानांच्या तपासण्या केल्या आहेत. यात १ हजार ६३६ दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात आल्या आहेत.


५२२ दुकानांवर अद्यापही मराठी पाट्या नाहीत, त्यामुळे महापालिकेने पालिकेच्या नियमानुसार ७ दिवसांची नोटीस दिली आहे. या नोटीसीनंतरही मराठी नाम फलक बसवण्यात आले नाही, तर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान पालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यासाठी व्यापारी संघटना सर्वोच न्यायालयात गेली आहे, असे असताना पालिकेने मात्र मुंबईतील दुकानांची तपासणी सुरू केली आहे.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या

Eknath Shinde : "आजचा मेळावा म्हणजे द्वेष, जळजळ, मळमळ..."; उपमुख्यमंत्री शिंदेचा राज-उद्धव मेळाव्याला टोला

"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा" : उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २०

मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की राजकीय नौटंकी!

भाजपा नेत्यांनी उडवली ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची खिल्ली! मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या

संचमान्यतेमुळे राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

कोकणातील ९९ शाळांनाही बसणार फटका मुंबई : शिक्षण विभागाने संचमान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका