मुंबईत शरद पवार गटाला धक्का! राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई: राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. शरद पवार गटाने मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी रोहित पवार यांना दिल्याने राखी जाधव नाराज झाल्याचे चिन्ह आहे. यामुळे शरद पवार गटाला राम राम देऊन, भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. राखी जाधव यांचा आजच पक्षप्रवेश होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबई अध्यक्षांनीच पक्षाची साथ सोडल्यामुळे शरद पवार गटाला धक्का बसणार आहे.


राखी जाधव या गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा किल्ला एकहाती लढवत होत्या. राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्या शरद पवार गटासोबत एकनिष्ठ होत्या. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शरद पवार गट आणि उबाठामध्ये असलेल्या आघाडीमध्ये शरद पवार गटाच्या वाट्याला फक्त ५ ते १० जागा आल्याने त्या प्रचंड नाराज झाल्या होत्या. राखी जाधवांप्रमाणेच गटातील इतर कार्यकर्तेसुद्धा नाराज असल्याने अनेकांनी अजित पवारांकडे मोर्चा वळवला. तर राखी जाधव यांनी थेट कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

राखी जाधव या राजकारणातील प्रवेशापासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत. पक्ष फुटीनंतर त्या शरद पवार गटामध्ये सक्रिय होत्या. मागील अनेक वर्षापासून त्या मुंबईमध्ये राष्ट्रवादीची धुरा सांभाळत आहेत. घाटकोपरच्या पूर्व भागात त्या स्थानिक नेत्या म्हणून सक्रिय असून मतदार संघातील प्रत्येकासोबत त्यांचा जवळचा संबंध आहे. मागील दोन वर्षापासून त्या शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत असून त्यांच्याकडे अनेक वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र