मुंबई उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार

१८,३६४ कोटींचे ४०० किमी रेल्वे प्रकल्प मार्गी


मुंबई : मुंबईची उपनगरीय रेल्वेव्यवस्था येत्या काही वर्षांत आमूलाग्र बदलणार आहे. वाढती प्रवासीसंख्या, लोकलमधील प्रचंड गर्दी आणि वारंवार होणारा विलंब या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेकडून तब्बल १८ हजार ३६४.९४ कोटी रुपये खर्चाचे ४००.५३ किलोमीटर लांबीचे विविध रेल्वे प्रकल्प राबवले जात आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोकल तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांची संख्या वाढण्यासोबतच वेळपालनात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.


मुंबईची उपनगरी रेल्वेसेवा सध्या सीएसएमटी ते कर्जत-खोपोली, कसारा, पनवेल, वांद्रे, ठाणे-पनवेल तसेच नेरूळ-बेलापूर ते उरण या मार्गांवर विस्तारलेली आहे. या सर्व मार्गांवर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असून त्यानुसार पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नेरूळ-उरण मार्गावर १० नव्या लोकल सेवा सुरू करण्यात आल्या असून तरघर आणि गव्हाण ही दोन नवी स्थानकेही कार्यान्वित झाली आहेत.


मध्य रेल्वेवर क्षमतेत मोठी वाढ


मध्य रेल्वेवर सुरू असलेल्या सीएसएमटी-कुर्ला पाचवा व सहावा मार्ग, पनवेल-कर्जत उपनगरी कॉरिडॉर, कल्याण-आसनगाव चौथा मार्ग, कल्याण-बदलापूर तसेच बदलापूर-कर्जत अतिरिक्त मार्ग आणि ऐरोली-कळवा उन्नत लिंक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे मार्गक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या कामांमुळे नव्या लोकल फेऱ्या सुरू करणे शक्य होणार असून, गाड्यांमधील गर्दी कमी होऊन वेळपालन सुधारेल. विशेषतः बदलापूर-कर्जत मार्ग हा मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक सुलभ होण्यासोबतच मालवाहतुकीला गती मिळणार असून पर्यावरणीय लाभही अपेक्षित आहेत.


पश्चिम रेल्वेवरही प्रवाशांना दिलासा


पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावा मार्ग, गोरेगाव-बोरिवली हार्बर मार्गिका, बोरिवली-विरार पाचवा व सहावा मार्ग आणि विरार-डहाणू अतिरिक्त मार्ग या प्रकल्पांमुळे प्रवासी व मुख्य गाड्यांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे विरारपलीकडील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, मुख्य व उपनगरी गाड्यांचे स्पष्ट विभाजन करणे शक्य होईल. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, हे सर्व प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरी रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार असून प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक विश्वासार्ह, आरामदायी आणि वेळेवर होणार आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक

Chandrashekar Bawankule : देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याच्या प्रारूपाला स्थगिती

सुधारित प्रारूपासाठी खारगे समिती स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : महाराष्ट्रातील

Weekly Public Transport Day in BKC : बीकेसीमध्ये दर शुक्रवारी पाळणार ‘साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’

- इंधन बचतीसाठी निर्णय; २ लाख कर्मचारी करणार सार्वजनिक प्रवासी वाहनांचा वापर मुंबई : जागतिक इंधन तुटवड्याच्या

Mumbai News : मुंबईत १५ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य? सात बांगलादेशी नागरिक अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवैध स्थलांतराविरोधात मोठी कारवाई करत सात बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक केली