Categories: क्रीडा

‘टी२० वर्ल्ड कप’च्या विजयगीताचे अनावरण

Share

मुंबई (वार्ताहर) : आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप २०२२ मध्ये भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देण्यासाठी चिअरिंग स्क्वाड इंडिया फाउंडेशनतर्फे (सीएसआयएफ) ‘विजयी भव’ या विजयगीताचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.

हे गाणे पवित्र संस्कृत श्लोकाने सुरू होते आणि ‘विजयी भव’ची तान वाढत जाते आणि सकारात्मक लहरी निर्माण होतात. www.myomnamo.com आणि चिअरिंग स्क्वाड इंडिया फाउंडेशन यांची ही संकल्पना आणि निर्मिती आहे. हे गाणे प्रज्ञा पळसुले यांनी शब्दबद्ध आणि स्वरब्ध केले आहे. आणि उदयोन्मुख गायक अभिषेक नलावडे यांनी हे गाणे गायले आहे.

चिअरिंग स्क्वाड इंडिया फाउंडेशनचे (सीएसआयएफ) संस्थापक मकरंद पाटील म्हणाले, ‘विजय भव’ हे गाणे भारतीय क्रिकेट संघाच्या निर्धाराचे प्रतीक आहे, जो प्रत्येक सामन्यात कुरुक्षेत्राची लढाई मानून जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. संपूर्ण देशाने एकत्र येऊन प्रार्थना करावी, ही या मागील संकल्पना आहे. ‘विजयी भव’ हे गाणे म्हणजे एक अब्ज भारतीयांनी भारतीय क्रिकेट संघाला दिलेल्या पाठिंब्याचे प्रतीक आहे.”

Recent Posts

Mumbai Metro : मेट्रो-३ फेज २ ए मार्ग लवकरच होणार सुरू!

मे महिन्याच्या सुरवातीस होणार उद्घाटन मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai Metro) मेट्रो-३ फेज…

26 minutes ago

मुंबईतील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी बीएमसीकडून विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन

मुंबई : ‘संपूर्ण सखोल स्वच्छता अभियान’ अंतर्गत मुंबईतील लहानसहान रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता केल्यानंतर शासकीय, महानगरपालिका…

28 minutes ago

Shah Rukh Khan : पहलगाम हल्ल्यानंतर शाहरुख खानचा ‘तो’ व्हिडिओ चर्चेत!

मुंबई : काश्मीरमधील पहलगाम येथे (Pahalgam Terror Attack) २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला झाला. यानंतर…

58 minutes ago

AC Compressor: उन्हाळयात ​AC कम्प्रेसर फुटून आग लागण्याचा धोका सर्वाधिक! ही घ्या काळजी

AC Compressor Summer Care: उन्हाळा सुरु होताच एसी कंप्रेसरचा स्फोट झाल्याच्या बातम्या समोर येतात. पण…

1 hour ago

Nashik News : ईडीची मोठी कारवाई! मालेगावात एकाच वेळी ९ ठिकाणी छापेमारी

मालेगाव : नुकतेच सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ५० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी मुंबईतील सात ठिकाणी छापे…

1 hour ago

शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाची घरे देणार – बावनकुळे

मुंबई : शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे.…

1 hour ago