पक्षचिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

  74

नवी दिल्ली : ठाकरे आणि शिंदे गटातील पक्षचिन्हाबाबतच्या वादावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात पक्षचिन्हाबाबत आज सुनावणी होणार होती पण शिवसेना आज पुरावे सादर करणार असून ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीतील ट्वीस्ट वाढला आहे.


अंधेरी येथील पोटनिवडणूक तोंडावर आली असून येत्या ३ नोव्हेंबरला यासाठी मतदान होणार आहे. तर १७ ऑक्टोबपर्यंत अर्ज परत घेण्याची मुदत आहे. त्यामुळे लवकर पक्षचिन्हाचा निकाल लागला तर दोन्ही गटाचे संभ्रम दूर होणार आहेत. तर अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पक्षचिन्हाचा निकाल लागला नाही तर या निवडणुकीत दोन्ही गटासाठी प्रश्न निर्माण होणार आहेत.


सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने हा निकाल येण्याआधी पक्षचिन्हाबाबत आणि पक्षाबाबत निर्णय देऊ नये अशी याचिका दाखल केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ही स्थगिती उठवल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या प्रकरणावर सुनावणी होत आहे.


जर या पोटनिवडणुकीच्या आधी पक्षचिन्हाबाबतचा निकाल लागला नाही तर शिंदे गट भाजपकडून आपला उमेदवार उभा करणार असल्याची चर्चा आहे. पण पुरावे सादर केल्यानंतर लगेच हा निर्णय होऊ शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गटाने पक्षचिन्ह आम्हाला द्या अशी मागणी केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे.

Comments
Add Comment

निवडणूक आयोगाची उद्या दिल्लीत पत्रकार परिषद, नेमकी कशासाठी?

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग उद्या, रविवारी (१७ ऑगस्ट) दुपारी ३ वाजता नॅशनल मिडिया सेंटर नवी दिल्ली येथे

FASTag वार्षिक पासला प्रचंड प्रतिसाद, पहिल्याच दिवशी १.४ लाख पासची बुकिंग

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या FASTag वार्षिक पासला पहिल्याच दिवशी

नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन यांचे निधन

चेन्नई: नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन (L.A. Ganesan) यांचे शुक्रवारी (१५ ऑगस्ट, २०२५) रात्री चेन्नई येथील रुग्णालयात निधन

Accident news: स्वातंत्र्यदिनी मोठा बस अपघात! १० जणांचा जागीच मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

बर्दवान: देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून

दिल्ली : हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूं मकबऱ्यामध्ये भिंत कोसळल्याची

IIT Hyderabad AI Driverless Bus : भारताचा टेक्नॉलॉजी चमत्कार! IIT हैदराबादमध्ये ड्रायव्हरविना बस, १० हजार प्रवाशांनी घेतला भन्नाट अनुभव

हैदराबाद : हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Hyderabad) ने तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात करत देशातील