पक्षचिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली : ठाकरे आणि शिंदे गटातील पक्षचिन्हाबाबतच्या वादावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात पक्षचिन्हाबाबत आज सुनावणी होणार होती पण शिवसेना आज पुरावे सादर करणार असून ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीतील ट्वीस्ट वाढला आहे.


अंधेरी येथील पोटनिवडणूक तोंडावर आली असून येत्या ३ नोव्हेंबरला यासाठी मतदान होणार आहे. तर १७ ऑक्टोबपर्यंत अर्ज परत घेण्याची मुदत आहे. त्यामुळे लवकर पक्षचिन्हाचा निकाल लागला तर दोन्ही गटाचे संभ्रम दूर होणार आहेत. तर अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पक्षचिन्हाचा निकाल लागला नाही तर या निवडणुकीत दोन्ही गटासाठी प्रश्न निर्माण होणार आहेत.


सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने हा निकाल येण्याआधी पक्षचिन्हाबाबत आणि पक्षाबाबत निर्णय देऊ नये अशी याचिका दाखल केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ही स्थगिती उठवल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या प्रकरणावर सुनावणी होत आहे.


जर या पोटनिवडणुकीच्या आधी पक्षचिन्हाबाबतचा निकाल लागला नाही तर शिंदे गट भाजपकडून आपला उमेदवार उभा करणार असल्याची चर्चा आहे. पण पुरावे सादर केल्यानंतर लगेच हा निर्णय होऊ शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गटाने पक्षचिन्ह आम्हाला द्या अशी मागणी केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च