मूर्ती चालल्या परत मूर्तिकारांकडे; पनवेलमध्ये अनोखा उपक्रम

नवीन पनवेल (वार्ताहर) : गणेशमूर्ती पूजनानंतर घरच्या घरी विसर्जन करून उरलेली माती मूर्तिकारांना परत देऊन शून्य प्रदूषणाचा अभूतपूर्व उपक्रम खारघर, कामोठे, सुकापूर, पनवेल, नवीन पनवेल व करंजाडे येथील पनवेल वैस्ट वॉरियर्सकडून मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.


या उपक्रमात घनश्याम पाटील, गौरी काशीकर, प्रल्हाद बोडके, तनय दीक्षित, विनोद शिंगण व वृषाली म्हात्रे यांनी कृतीतून जनजागृतीची मुहूर्तमेढ रोवली. मूर्तिकारांचा आर्थिक फायदा, पर्यावरण संरक्षण व मूर्तीच्या मातीतून परत देवाच्या मूर्ती घडून पवित्र व अध्यात्मिक लाभ, अशी त्रिसूत्री असलेला कार्यक्रम गणेश शिंदे, प्रतिक्षा महाडिक, राजीव अधिकारी व तुषार लेले यांनी भक्तिभावाने साजरा केला.


प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात लवकर न विरघळल्याने, मूर्तीचे अवयव भंगतात. मोठाले तुकडे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे आणून प्रवाह तुंबतात. त्याचबरोबर जलस्त्रोतांची गढूळता, ऍसिडिटी, उष्णता व क्षारता वाढते. पाण्यातील ऑक्सिजन कमी होतो. प्रकाश कमी मिळाल्याने प्रकाश संश्लेषणात अडथळे येतात. मूर्तीच्या सिंथेटिक रंगातील जड व विषारी धातू पाणवनस्पती व माश्यांमधून अन्नसाखळीत प्रवेश करतात.


विसर्जनानंतर कृत्रिम तलावातून काढलेले डेब्रीस हे देखील प्रचंड मृदा प्रदूषण करते. दरवर्षी मूर्ती विसर्जनाचा आकडा २० करोडच्या घरात जातो. पनवेल वैस्ट वॉरियर्सनी या परिस्थितीचा अभ्यास केला. काळाची गरज ओळखून मूर्ती घरच्याघरी विसर्जनानंतर राहिलेली माती मूर्तिकारांना भेट देऊन अनेक दुष्परिणाम थांबवण्याचा पायंडा पाडला. दगड, धातू वा मातीची मूर्ती हे पर्याय देखील डोळस नागरिकापुढे आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी व वाहतूक कोंडी न करता, शून्य डेब्रीज, शून्य प्रदूषण व शून्य खर्चाचा हा उपक्रम लवकरच सर्वत्र करण्याचा मानस पनवेल वैस्ट वॉरियर्सचा आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग