सहकारी संस्थेकडून जीएसटीमध्ये सवलत देण्याची मागणी

विरार (वार्ताहर) : वसईसह राज्याच्या इतर भागातील सहकारी संस्थांना अनेक समस्या भेडसावत आहेत. सहकारी संस्थांकडून विक्री केल्या जाणाऱ्या मालावर राज्य शासनाने लावलेला जीएसटी कमी करावा आणि सहकारी संस्थांना दिलासा द्यावा, या मागणीसह इतर विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी वसईतील सहकारी संस्थेतर्फे केली जात आहे.


सहकारी संस्थांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे; मात्र राज्य शासनाच्या विविध धोरणांमुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी वसई पान मार्केटिंग सहकारी सोसायटीचे चेअरमन रोहन गोन्साल्विस यांनी राज्याचे सहकार मंत्री सावे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. शेड्युल बँकांना गुंतवणूक करण्याची जी मुभा आहे, त्याप्रमाणे सहकारी संस्थांना गुंतवणूक करण्याची सुविधा असावी.


तसेच ज्या सहकारी संस्थांचा निव्वळ नफा ५० कोटींपेक्षा कमी आहे त्यांना आयकरातून सूट मिळावी. यासह सहकारी संस्थांकडून विक्री केल्या जाणाऱ्या मालावर राज्य शासनाने जीएसटी कमी आकारावा जेणेकरून खासगी व्यापाराबरोबर स्पर्धा करता येईल; तर खासगी व्यापारी माल जीएसटी न लावता विकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैसा निर्माण होतो. त्यामुळे यावर आळा घालता येईल, अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जास शासन हमी

मुंबई : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील

वसई विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास गती

विरार, विराट नगर, ओस्वालनगरी नालासोपारा, अलकापुरी, उमेळमान या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन मुंबई : वसई

वसईत बर्डपार्क उभारण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक सरसावले!

मुंबई : वसई विरार महापालिकेच्या हद्दीत बर्ड पार्क उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या पार्कमध्ये पक्षांना

एक हजार रुपयांच्या मोबदल्यात ६ वर्षाच्या बालकाला जुंपले कामाला !

जिल्ह्यातील आदिवासी कातकरी मुलांचे बालमजुरीसाठी शोषण आजही सुरुच पालघर : पालघर जिल्ह्यातील आदिवासी कातकरी

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी ६८ कोटींचा खर्च

विरार : वसई - विरार पालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यांच्या