कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तवचे निधन

नवी दिल्ली : कॉमेडीचा बादशहा अशी ओळख असलेले टीव्ही मनोरंजन विश्वात वेगळे स्थान निर्माण केलेल्या राजू श्रीवास्तवचे आज वयाच्या ५८व्या वर्षी निधन झाले.


गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्याने प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन केले होते. त्याच्या जाण्याने टीव्ही मनोरंजन तसेच बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे.


१० ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना तो ट्रेड मिलवर धावत असताना त्याला अचानक हदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी एम्समध्ये दाखल केले होते. एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती.


https://twitter.com/ANI/status/1572452009852411906

राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. राजकीय, बॉलिवूड अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्याला आदरांजली वाहिली आहे.


१९८९ मध्ये रिलीज झालेल्या मैने प्यार किया या चित्रपटात त्यांनी काम केले होते. २००५ मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. तसेच 'बिग बॉस ३', 'नच बलिए' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केले. ‘द किंग ऑफ कॉमेडी’ अशीही राजू श्रीवास्तव यांची ओळख होती. तसेच त्यांच्या ‘गजोधर भैय्या’ या भूमिकेला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

Comments
Add Comment

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी