कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तवचे निधन

Share

नवी दिल्ली : कॉमेडीचा बादशहा अशी ओळख असलेले टीव्ही मनोरंजन विश्वात वेगळे स्थान निर्माण केलेल्या राजू श्रीवास्तवचे आज वयाच्या ५८व्या वर्षी निधन झाले.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्याने प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन केले होते. त्याच्या जाण्याने टीव्ही मनोरंजन तसेच बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे.

१० ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना तो ट्रेड मिलवर धावत असताना त्याला अचानक हदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी एम्समध्ये दाखल केले होते. एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती.

राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. राजकीय, बॉलिवूड अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्याला आदरांजली वाहिली आहे.

१९८९ मध्ये रिलीज झालेल्या मैने प्यार किया या चित्रपटात त्यांनी काम केले होते. २००५ मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. तसेच ‘बिग बॉस ३’, ‘नच बलिए’ आणि ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केले. ‘द किंग ऑफ कॉमेडी’ अशीही राजू श्रीवास्तव यांची ओळख होती. तसेच त्यांच्या ‘गजोधर भैय्या’ या भूमिकेला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

1 hour ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago