मांजरांनी कितीही म्याव म्याव केले तरी तो वाघाची डरकाळी फोडू शकत नाही

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उडवली शिवसेनेची खिल्ली


अमरावती : शिवसेना शरद पवारांच्या पिंजऱ्यामधील मांजर आहे. पिंजऱ्यातल्या मांजरांनी कितीही म्याव म्याव केले तरी तो वाघाची डरकाळी फोडू शकत नाही, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाची खिल्ली उडवली. ते आज अमरावतीत पत्रकारांशी बोलत होते.


राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांच्यावर टीका केली जात असताना त्याला मनसेने सडेतोड प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते तसेच शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मनसेला भाजपची शाखा म्हटले होते. त्यावर देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आउटडेटेड नेते आहेत. त्यांना शिवसेनेत कोणीही विचारत नव्हते. त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये. शिल्लक राहिलेल्या सेनेला त्यांनी वाचवावे, असा उपरोधिक सल्ला देशपांडे यांनी दिला आहे.


राज ठाकरे यांचा धसका शिवसेनेने घेतला असून, ज्या पद्धतीचा प्रतिसाद विदर्भात मनसेला मिळत आहे. तो प्रतिसाद बघितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. पुढे अंबादास दानवे यांचा समाचार घेताना देशपांडे म्हणाले की, अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांच्याबाबत काहीच बोलू नये. चार दिवसाआधी यांना शिवसेनेत कुणीही विचारत नव्हते. त्यामुळे त्यांनी कोणावर बोलावे, शिवसेनेचे नेतृत्व हे आउटडेटेड असून, औरंगाबाद येथील नेते देखील आउटडेटेड आहे. ते दानवे असो की, खैरे सगळे आउटडेटेड आहेत, असे देशपांडे म्हणाले.


पुढे दसरा मेळाव्याबाबत बोलताना देशपांडे म्हणाले की, त्यांनी दसरा मेळावा घ्यावा किंवा न घ्यावा त्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही. कितीही शिवतीर्थावर दसरा मेळावा केला तरीही बाळासाहेबांचे विचार तुमच्यात आहेत का? असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे. जर विचारच तुमच्याकडे नसतील तर तुम्ही मेळावे घेऊन जनतेला काय देणार आहेत. तुम्ही हिंदुत्वाचे, मराठी माणसाचे विचार देणार आहात का? तुम्ही फक्त राष्ट्रवादी, शरद पवारांचे विचार देणार आहात, अशीही टीका त्यांनी केली.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद