मांजरांनी कितीही म्याव म्याव केले तरी तो वाघाची डरकाळी फोडू शकत नाही

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उडवली शिवसेनेची खिल्ली


अमरावती : शिवसेना शरद पवारांच्या पिंजऱ्यामधील मांजर आहे. पिंजऱ्यातल्या मांजरांनी कितीही म्याव म्याव केले तरी तो वाघाची डरकाळी फोडू शकत नाही, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाची खिल्ली उडवली. ते आज अमरावतीत पत्रकारांशी बोलत होते.


राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांच्यावर टीका केली जात असताना त्याला मनसेने सडेतोड प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते तसेच शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मनसेला भाजपची शाखा म्हटले होते. त्यावर देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आउटडेटेड नेते आहेत. त्यांना शिवसेनेत कोणीही विचारत नव्हते. त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये. शिल्लक राहिलेल्या सेनेला त्यांनी वाचवावे, असा उपरोधिक सल्ला देशपांडे यांनी दिला आहे.


राज ठाकरे यांचा धसका शिवसेनेने घेतला असून, ज्या पद्धतीचा प्रतिसाद विदर्भात मनसेला मिळत आहे. तो प्रतिसाद बघितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. पुढे अंबादास दानवे यांचा समाचार घेताना देशपांडे म्हणाले की, अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांच्याबाबत काहीच बोलू नये. चार दिवसाआधी यांना शिवसेनेत कुणीही विचारत नव्हते. त्यामुळे त्यांनी कोणावर बोलावे, शिवसेनेचे नेतृत्व हे आउटडेटेड असून, औरंगाबाद येथील नेते देखील आउटडेटेड आहे. ते दानवे असो की, खैरे सगळे आउटडेटेड आहेत, असे देशपांडे म्हणाले.


पुढे दसरा मेळाव्याबाबत बोलताना देशपांडे म्हणाले की, त्यांनी दसरा मेळावा घ्यावा किंवा न घ्यावा त्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही. कितीही शिवतीर्थावर दसरा मेळावा केला तरीही बाळासाहेबांचे विचार तुमच्यात आहेत का? असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे. जर विचारच तुमच्याकडे नसतील तर तुम्ही मेळावे घेऊन जनतेला काय देणार आहेत. तुम्ही हिंदुत्वाचे, मराठी माणसाचे विचार देणार आहात का? तुम्ही फक्त राष्ट्रवादी, शरद पवारांचे विचार देणार आहात, अशीही टीका त्यांनी केली.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार