अलिबाग (वार्ताहर) : लम्पी स्कीन या पशुधनाच्या आजाराबाबत पशुपालकांनी घाबरून न जाता शासनाने सुचविलेल्या उपाययोजनांचे पालन करावे. एखाद्या जनावरामध्ये आजाराची लक्षणे दिसल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
लम्पी स्कीन हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. मात्र हा आजार जनावरांपासून माणसांना होत नाही. यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. एखाद्या जनावराला हा आजार झाल्यास त्याच्यावर सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात मोफत उपचार करण्यात येत आहेत. तसेच या आजाराला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतींना गोठ्यांमध्ये कीटकनाशक फवारणी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती डॉ. किरण पाटील यांनी दिली. या आजाराला आळा घालण्यासाठी जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक थांबवावी असेही त्यांनी सांगितले.
या आजाराची लक्षणे म्हणजे जनावरे खाणे पिणे सोडून देतात किंवा कमी खातात. तसेच त्याला ताप येतो, डोळ्यातून व तोंडातून चिकट स्त्राव येतो, पायाला सूज येते आणि अंगावर १० – २० मि.मि.च्या गाठी निर्माण होतात. त्यासाठीचा खबरदारीचा उपाय म्हणून जे जनावर या रोगाने आजारी आहे, त्यास ताबडतोब वेगळे केले पाहिजे व नजिकच्या पशुवैद्यकीय केंद्राला त्याची सूचना दिली पाहिजे. किंवा १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. पशुवैद्यकाकडून बाधित जनावराची उपचार करून घेणे तसेच माशा, गोचीड व इतर तत्सम कीटक यांच्यापासून दुसऱ्या जनावरांना याचा संसर्ग होऊ नये यासाठी कीटकनाशक फवारणी करून घेणे आवश्यक असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…