मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कोळीवाडे हे आपले वैभव आहे. या कोळीवाड्यांचे सीमांकन करण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. या कोळीवाड्यांच्या विकासासाठी विशेष विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात आली आहे. हा विकास करताना कोळी समाजाला विश्वासात घेतले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
या संदर्भात संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात येईल तसेच जेथे सीमांकन झालेले नाही तेथे नव्याने एसआरएचे प्रस्ताव मंजूर केले जाणार नाहीत, असेही ते म्हणाले. दरम्यान सदस्य सचिन अहिर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. फडणवीस म्हणाले, गावठाणांना सीआरझेड लागू होत नाही. त्यामुळे सध्याच्या नियमावलीमधील नियमांच्या अंतर्गत त्यांना दुरुस्तीसाठी परवानगी देण्याच्या सूचना विभागाला दिल्या जातील. त्यांना अधिकचा एफएसआय देण्याबाबतही शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप, विजय ऊर्फ भाई गिरकर, कपिल पाटील आदींनी सहभाग घेतला.
पर्यटकांना खोऱ्यात प्रवेश करण्यास बंदी नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) जम्मू…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे कन्नड तालुक्यात एका लग्न समारंभातील जेवणातून तब्बल…
अंत्यसंस्काराला अडीच लाख लोकांची उपस्थिती नवी दिल्ली : ख्रिश्चन कॅथोलिक धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे…
जम्मू आणि काश्मीर: पहलगामध्ये (Pahalgam Terror Attack) झालेली भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात सरकारने कठोर पाऊले उचलण्यास…
मंत्री नितेश राणे यांनी दिला दापोलीवासीयांना विश्वास दापोली : आज आजूबाजूची परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे…
मुंबई : 'प्लानेट मराठी'चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनी 'प्लानेट स्त्री'…