महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली : महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशात भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार महाराष्ट्रात भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल आणि काश्मीरमध्ये ३.४ इतकी होती. जम्मू-काश्मीरमध्ये आज पहाटे ३.२८ च्या सुमारास हे धक्के जाणवले. कटरापासून ६२ किमी अंतरावर ईशान्य-उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. भारतासह अफगाणिस्तानातील काबूलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे.


कोल्हापूरपासून पूर्वेला १७१ किमी अंतरावर महाराष्ट्रात मध्यरात्री २:२१ च्या सुमारास ३.९ तीव्रतेचा भूकंपाचे हादरे जाणवले. भूकंपाचा प्रभाव जमिनीच्या १० किलोमीटर खोलवर होता. तर, काश्मीरमध्ये पहाटे ३:२८ वाजण्याचा सुमारास जाणवलेले भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली पाच किलोमीटरपर्यंत होता. अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये मध्यरात्री २:५५ वाजण्याच्या सुमारास जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता ४.३ इतकी रिस्टर स्केल होती. येथील भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली ८० किमी खोलीवर होता.


दरम्यान, या सर्व ठिकाणी जाणवलेल्या भूकंपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत अधिकचे अपडेट्स येणे बाकी आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च