महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के

  78

नवी दिल्ली : महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशात भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार महाराष्ट्रात भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल आणि काश्मीरमध्ये ३.४ इतकी होती. जम्मू-काश्मीरमध्ये आज पहाटे ३.२८ च्या सुमारास हे धक्के जाणवले. कटरापासून ६२ किमी अंतरावर ईशान्य-उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. भारतासह अफगाणिस्तानातील काबूलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे.


कोल्हापूरपासून पूर्वेला १७१ किमी अंतरावर महाराष्ट्रात मध्यरात्री २:२१ च्या सुमारास ३.९ तीव्रतेचा भूकंपाचे हादरे जाणवले. भूकंपाचा प्रभाव जमिनीच्या १० किलोमीटर खोलवर होता. तर, काश्मीरमध्ये पहाटे ३:२८ वाजण्याचा सुमारास जाणवलेले भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली पाच किलोमीटरपर्यंत होता. अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये मध्यरात्री २:५५ वाजण्याच्या सुमारास जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता ४.३ इतकी रिस्टर स्केल होती. येथील भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली ८० किमी खोलीवर होता.


दरम्यान, या सर्व ठिकाणी जाणवलेल्या भूकंपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत अधिकचे अपडेट्स येणे बाकी आहे.

Comments
Add Comment

ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात वाढला भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाचा डंका; ‘या’ देशाचा ‘आकाश’मध्ये रस

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताची गरुडझेप : आता पाकिस्तान-चीनच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर!

नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'मधील यशानंतर भारताने आता मोठी कंबर कसली आहे! शत्रू देशांच्या मनात धडकी भरेल अशी एक

भारत-पाक सीमेवर आढळले दोन मृतदेह, पाकिस्तानी सिम-ओळखपत्रे जप्त

जयपूर: राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर एक अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण, पुढील पाच दिवस पावसाचे

मुंबई (प्रतिनिधी) : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन