पश्चिम बंगालमध्ये ५८.८ लाख मतदारांची नावे यादीतून वगळणार

कोलकाता : २०२६ पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या शुद्धीकरणाची एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सुमारे ५८.८ लाख (५८,०८,००२) मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची तयारी सुरू आहे.


निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राज्याचे संपूर्ण राजकीय चित्र बदलण्याची शक्यता असून, तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मतदार यादीत अनेक प्रकारच्या मतदारांना चिन्हांकित करण्यात आले आहे. यामध्ये सर्वात मोठा गट मृत मतदारांचा आहे. त्यानंतर नोंदणीकृत पत्त्यावर न सापडलेले, अस्पष्ट नोंदी असलेले मतदार यांचा समावेश आहे. ही नावे आता मसुदा मतदार यादीत दिसणार नाहीत.


राजकीय वर्तुळात खळबळ


मतदार यादीतील एवढ्या मोठ्या बदलांमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी याविरोधात धरणे आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र भाजपने (तृणमूल काँग्रेस) टीएमसीचे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रक्रियेमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून,
१६ डिसेंबर रोजी मसुदा यादी प्रसिद्ध होणार आहे.


मोहिमेची कारणे आणि आकडेवारी


निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विशेष मतदार पुनरीक्षण मोहिमे'अंतर्गत घरोघरी केलेल्या सर्वेक्षणानंतर ही नावे वगळण्यासाठी चिन्हांकित करण्यात आली आहेत.




  • मृत मतदार : २४ लाखांहून अधिक.
    स्थलांतरित/अनुपस्थित : १२ लाखांहून अधिक.

  •  दुबार नोंदी : सुमारे २० लाख
    यांचा समावेश आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या