राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट


नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत असल्याने राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे किमान झाली असून, पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने सांगितला. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट जरी करण्यात आला आहे.


नागपूरच्या एमआयडीसी, पाचपावली आणि वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यांचा मृत्यू थंडीने गारठल्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तिघांचीही ओळख अद्याप पटलेली नाही. ते बेघर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाचपावली येथे मेट्रोच्या पिलरखाली, तर एमआयडीसी परिसरात कॅफेसमोर मृतदेह आढळून आले. याबाबतचा अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.


मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात आणि विदर्भातील गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.


किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट, तर तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचे समजले जाते. राज्यात पुढील ४८ तासात किमान तापमानात १ ते २ अंशांची घट होणार असून त्यानंतर २ ते ३ अंश सेल्सिअसने किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उद्या विदर्भातील गोंदिया, नागपूर, वर्धा तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.


परभणीचा पारा घसरला


परभणी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून परभणीचे तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. दोन दिवसांपासून थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे. सध्या परभणीचे तापमान ५.५ अंशांवर नोंदवले गेले आहे, आणि त्यामुळे ग्रामीण भागात अक्षरशः हाडे गोठवणारी थंडी जाणवत आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात ही शेकोट्या पेटायला लागल्या आहेत. येवढ्या कडाक्याच्या थंडीत शेतकरी शेतात ऊस ,हरबरा, ज्वारी , या पिकांना रात्रीची लाईट असल्याने पाणी देत आहे, तर परभणीचे तापमान अतिशय कमी झाले असल्याने शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहे.


थंडीमुळे तीन जणांचा मृत्यू


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सर्व भागांत कडाक्याची थंडी जाणवत आहे. अनेक ठिकाणी तर पारा १० अंशांच्या खाली आला आहे. विदर्भात तर थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत नागपूरमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृत्यू हे थंडीने गारठून झाल्याची शक्यता सांगितले जात आहे.


Comments
Add Comment

NEET Paper Leak 2026 : NEET फेरपरीक्षेसाठी सरकारचा मास्टरप्लॅन! पेपर सुरक्षेसाठी आता थेट वायूदलाची एन्ट्री

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर

Ajmer Former Sarpanch Murder Case : अजमेरमध्ये थरकाप उडवणारी घटना! स्कॉर्पिओत माजी सरपंचांसह चौघांना जिवंत जाळलं; अपघाताचा बनाव उघडकीस

अजमेर : राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. माजी सरपंच,

First Indigenous Hydrogen Train : ‘ग्रीन ट्रॅक’वर भारताची झेप! पहिली स्वदेशी हायड्रोजन रेल्वे लवकरच धावणार

नवी दिल्ली : हरित आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीच्या दिशेने भारताने मोठे पाऊल टाकले असून, देशातील पहिली स्वदेशी

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना आवाहन: इंधन बचतीसाठी कारपूलिंगचा अवलंब करा; प्रशासनात शिस्त आणि पर्यावरणपूरक पद्धतींवर भर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना

Twisha Sharma Case : ७ तासांच्या चौकशीनंतर मोठी कारवाई! सासू गिरिबाला सिंह अटकेत; सीबीआयचा तपास वेगात

ट्विशा शर्मा मृत्यू  (Twisha Sharma Case) प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत आरोपी गिरिबाला सिंह यांना अटक केली आहे. उच्च

Ivory Smuggling Racket Busted : भारतीय हस्तिदंत तस्करीचा पर्दाफाश! ४ किलो हत्तीच्या सुळ्यांसह तिघे जेरबंद

कर्नाटक : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) नागपूर विभागीय पथकाने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत भारतीय