मुंबई : इंधन दरवाढीमुळे टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्पन्नातील जास्तीत जास्त पैसे हे सीएनजी भरण्यासाठी जात असल्याने टॅक्सी आणि ऑटो रिक्षाच्या भाड्यात वाढ करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
मागण्या मान्य न झाल्यास मुंबईतील टॅक्सी चालक आणि ऑटोरिक्षा चालक १५ सप्टेबरपासून बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. सध्या टॅक्सीचे किमान भाडे हे २५ रुपये इतके आहे. त्यात १० रुपयांची वाढ करून ते ३५ रुपये इतके करावे, अशी युनियनची मागणी आहे.
भाडेवाढ व्हावी अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून सरकार प्रशासनाकडे रिक्षा टॅक्सी युनियनतर्फे करण्यात आली आहे. सरकार लक्ष देत नसल्याने ते आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. मुंबईतील टॅक्सी चालकांची १० रुपये इतक्या भाडेवाढीची मागणी आहे, तशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…