मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात सर्वांचे सहकार्य हवे

Share

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्ग तयार करण्याचे काम सरकार करतच आहे. पण, याकरिता लागणाऱ्या जमीन संपादनाच्या कामात स्थानिक आमदारांनी सहकार्य करण्याची गरज आहे, असे भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत सांगितले. दरम्यान, हा महामार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल तसेच गौरी – गणपतीसाठी येत्या २५ ऑगस्टपर्यंत त्यावरील खड्डे भरले जातील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

सुनील प्रभू यांनी या विषयावरील लक्षवेधी सूचना मांडली होती. कोकणात घरातली एक व्यक्ती गावी असते, तर चार मुंबईत. त्यात त्यांच्यात वाद असला तर जमीन संपादनाला वेळ लागतो. नुकसानभरपाई देणेही अवघड होते. त्यामुळेच स्थानिक आमदारांनी यात सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे, असे राणे म्हणाले.

गौरी-गणपतीच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा त्रास कमी करण्यासाठी या मार्गावरील सर्व खड्डे तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २५ ऑगस्टपर्यंत हे खड्डे भरले जातील आणि त्यानंतर लगेचच तेथे प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. या पाहणीच्या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सोबत घेतले जाईल, असेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Recent Posts

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

13 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

38 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

2 hours ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

2 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

3 hours ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

3 hours ago