मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात सर्वांचे सहकार्य हवे

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्ग तयार करण्याचे काम सरकार करतच आहे. पण, याकरिता लागणाऱ्या जमीन संपादनाच्या कामात स्थानिक आमदारांनी सहकार्य करण्याची गरज आहे, असे भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत सांगितले. दरम्यान, हा महामार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल तसेच गौरी - गणपतीसाठी येत्या २५ ऑगस्टपर्यंत त्यावरील खड्डे भरले जातील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.


सुनील प्रभू यांनी या विषयावरील लक्षवेधी सूचना मांडली होती. कोकणात घरातली एक व्यक्ती गावी असते, तर चार मुंबईत. त्यात त्यांच्यात वाद असला तर जमीन संपादनाला वेळ लागतो. नुकसानभरपाई देणेही अवघड होते. त्यामुळेच स्थानिक आमदारांनी यात सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे, असे राणे म्हणाले.


गौरी-गणपतीच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा त्रास कमी करण्यासाठी या मार्गावरील सर्व खड्डे तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २५ ऑगस्टपर्यंत हे खड्डे भरले जातील आणि त्यानंतर लगेचच तेथे प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. या पाहणीच्या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सोबत घेतले जाईल, असेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात