भुसावळ देवळाली पॅसेंजर एक्सप्रेस पुन्हा एकदा सुरू होणार

नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेने आपला व्यवसायिक दृष्टिकोन बदलत नाशिक, मनमाड, भुसावळ, जळगाव आदी परिसरातील प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुसावळ देवळाली पॅसेंजर पुन्हा एकदा सुरू होत आहे. मात्र आता ही गाडी पॅसेंजर न राहता एक्सप्रेस झाल्याने प्रवास भाडे महागणार असल्याने प्रवाशांना खिसा रिकामा करावा लागणार आहे.


मागील दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी रेल्वे बंद होत्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्वच प्रवासी रेल्वे गाड्या पुन्हा धावू लागल्या आहेत. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरही अनेक रेल्वे गाड्या थांबत आहेत. मात्र ग्रामीण भागातील प्रवाशी, शेतकऱ्यांना सोयीस्कर असणारी आणि आर्थिक चक्र गतिमान करणारी भुसावळ पॅसेंजर गाडी गेल्या अडीच वर्षापासून बंद आहे. दरम्यान याबाबत आनंदाची बातमी असून लवकरच ही गाडी सुरु होणार आहे.


रेल्वे प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला असून देवळाली-भुसावळ रेल्वे येत्या १६ सप्टेंबर पासून सुरु करीत आहेत. मात्र आत गाडीला पॅसेंजर ऐवजी एक्सप्रेसचा दर्जा देऊन देवळाली भुसावळ देवळाली प्रवासी रेल्वे एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. या गाडीला ग्रामीण भागातील जवळपास सर्वच रेल्वे स्थानकांवर थांबा असून एक्सप्रेसचा दर्जा असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचा प्रवास महागणार आहे. येत्या १६ सप्टेंबरपासून भुसावळून देवळालीकडे तर सप्टेंबर तर १७ सप्टेंबर पासून देवळालीहून भुसावळकडेही एक्सप्रेस धावणार आहे.


दरम्यान या गाडीला १२ डबे असून दहा डबे प्रवासी तर दोन डबे मालवाहतुकीसाठी असणार आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. गाडी क्रमांक ११११४ भुसावळ देवळाली एक्सप्रेस भुसावळ स्थानकातून सायंकाळी ५.३० वाजता सुटून जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, पानेवाडी, मनमाड, लासलगाव, निफाड, कसबे सुकेने, खेरवाडी, नाशिकरोड आणि देवळालीला पोहोचणार आहे. रात्री पावणे अकराच्या सुमारास ही एक्सप्रेस देवळाली स्टेशनवर पोहोचेल. त्यानंतर देवळाली स्थानकातून सुटणारी गाडी क्रमांक ११११३ ही सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी सुटेल. त्यानंतर ती दुपारी सव्वा बाराच्या सुमारास भुसावळला पोहोचेल.


कोरोना काळात बंद असलेली भुसावळ देवळाली पॅसेंजर अखेर सुरु होणार असून येत्या १६ सप्टेंबरपासून ती या मार्गावर धावणार आहे. मात्र या पॅसेंजरचे एक्सप्रेसमध्ये रूपांतर झाल्याने प्रवास भाडे वाढले आहे. जवळपास तिप्पट भाडे वाढणार असून यामुळे प्रवाशांना खिसा रिकामा करावा लागणार आहे. ही गाडी सुरुवातीला पॅसेंजर होती, मात्र आता एक्सप्रेस झाल्याने जवळपास तिप्पट भाडे द्यावे लागणार आहे.

Comments
Add Comment

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक