अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार?

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणखी आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील मुरूड येथील रिसॉर्टवर हातोडा पडणार असल्याचे सूचक ट्वीट किरीट सोमय्या यांनी केले आहे. रिसॉर्टच्या बांधकामप्रकरणी पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरवठा सुरू असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.


दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्याशिवाय, हे रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरला असल्याचा आरोप त्यांनी केला होता.


https://twitter.com/KiritSomaiya/status/1559358559535628289

किरीट सोमय्या यांनी आज सकाळी ट्वीट करून अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट येत्या दोन ते चार दिवसात पाडण्याचा अंतिम आदेश अपेक्षित असल्याचे सोमय्यांनी सांगितले.


दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांची ईडीने चौकशीदेखील केली होती. ईडीने परब यांच्या शासकीय आणि खासगी निवासस्थानीदेखील छापा मारला होता. त्यावेळी शिवसेनेने ही राजकीय सूडाने केलेली कारवाई असल्याचे म्हटले होते.


याआधी पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी ३१ जानेवारी २०२२ रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. ९० दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, ९० दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ

मुंबई : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी

“आजच्या तुलनेत आठ महिन्यांनी होणारी कर्जमाफी अधिक फायद्याची” – बच्चू कडू

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी

कार्तिकीसाठी राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार

सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा,