दमदार पावसामुळे सावित्री, गांधारी, काळ नद्या भरल्या!

महाड (वार्ताहर) : गेली चार दिवस संपूर्ण तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसत होता. सोमवारी पासून पावसाचा वेग वाढल्याने सावित्री गांधारी आणि काळ नद्या पुन्हा दुथडी भरून वाहू लागल्या असून महाड परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने व्यापारी नागरिकांमध्ये चिंतेच वातावरण पसरले आहे.


मागील वर्षाच्या २२ व २३ जुलैच्या जलप्रलयाच्या आठवणी ताज्या असतांनाच या वर्षी ८ ऑगस्ट पर्यत १९०७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच तारखेला २६०९ मि. मी. एवढा पाऊस झाला होता. म्हणजे यावर्षी पाऊस ७०० मि. मी. कमी प्रमाणात नोंदला गेला आहे. सध्या संपूर्ण तालुक्यात कोसळत असलेला पाऊस मागील वर्षाची सरासरी भरून काढण्यासाठी घोंगावत असल्याने तो धोकादायकही ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.


यावर्षी खुपच उशिराने वरुणराजाचे आगमन झाले होत. जुलै महिन्याच्या सुरुवाती पासून पावसाचा जोर वाढला होता, तो दिर्घकाळ कोसळल्याने जुलै महिन्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होत भात लावणीची कामेही पूर्णत्वास आली होती. मात्र हाच पाऊस जुलै महिन्याच्या अखेर काही दिवसासाठी गायब झाल्याने एक आठवडा उष्म्याच्या लाहिनी नको नको झाल होते. आता चार दिवसापासून पुन्हा वरूण राजा सक्रीय झालाय, तो मागील वर्षाची आपली वार्षिक सरासरी भरून काढण्यासाठीच. महाडकरांनी शेकडो वर्ष पूर पाहिले आहेत तर काही महापूरही त्यांनी अनुभवले आहेत.


महाड शहरात पूर येवून गेल्या शिवाय पावसाळा संपत नाही, अस एक समिकरणच बनल आहे. मात्र २००५ व २०२१ च्या महापुरानी महाडकरांचे कंबरडेच मोडल असल्याने आता महाडकरांना पूर नकोसा झाला आहे. मागील वर्षाच्या जलप्रकोपानंतर शासनाच्या वतीने सावित्री, काळ नद्या मधील गाळ उपसण्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. याच गाळ उपसण्याच्या कारणानी कदाचित यावर्षी आता पर्यंत २००० मि. मी. एवढा पासून नोंदवून सुद्धा शहरात पुराचे पाणी शिरलेल नाही. यामुळे आता व्यापारी आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र प्रशासनांकडून सर्व प्रकारची नैसर्गिक आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग