सुक्या मासळीची आवक वाढल्याने दर आटोक्यात

अलिबाग : रायगड जिल्हा ताज्या मासळीबरोबरच सुक्या मासळीसाठीही प्रसिद्ध असल्याने जिल्ह्यात ठिकाठिकाणी सुक्या मासळीच्या बाजारपेठा नजरेत पडतात. या बाजारपेठांमध्ये लाखोंची उलाढाल होत असून, सध्या रायगड जिल्ह्यात सुक्या मासळीची आवक वाढल्याने सुक्या मासळीचे दरही आटोक्यात आहेत. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांकडून मोठ्याप्रमाणात सुक्या मासळीची खरेदी होत असल्याचे चित्र आहे.


महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई, कोकण आणि किनारपट्टीच्या भागात सुकी मासळी खूप लोकप्रिय आहे. दरदिवशी समुद्रात मिळालेली ताजी मासळी ही सगळीच विकली जात नाही. त्यामुळे ही मासळी सुकवून नंतर विकली जाते.


सध्या ओली मासळी मुबलक प्रमाणात मिळत असल्याने अलिबाग, मुरड, उरण, श्रीवर्धन, नावगाव, वरसोली याठिकाणी मासळी सुकवली जाते. सध्या मासळी सुकविण्यासाठी, तर सायंकाळी सुकविलेली मासळी जमा करण्यासाठी कोळी महिलांची लगबग सुरु असते.


रायगड जिल्ह्यात ४ हजार ९९३ छोट्या-मोठ्या नौकांच्या माध्यमातून मासेमारी करण्यात येते. बाजारात ताजे मासे मुबलक आल्याने माशांना फारशी किंमत मिळत नाही. त्यामुळे शिल्लक राहिलेले ताजे मासे फेकून फुकट घालविण्यापेक्षा हे मासे सुकविले जातात. बोंबिल, अंबाड, जवळा, कोळंबी, ढोमी आदी छोट्या मासे देखील सुकविले जातात.


प्रमुख बाजारपेठा : अलिबाग, श्रीवर्धन, उरण, नावगाव.


प्रमुख मासळी : बोंबिल, कोळंबी, जवळा, बांगडा.


परिस्थिती : आवक वाढल्याने दर आटोक्यात, पर्यटकांची पसंती.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या