बर्मिंगहॅम (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल २०२२ स्पर्धेचा समारोप सोमवारी झाला असून भारताने एकूण ६१ पदकांची कमाई करत चौथे स्थान पटकावले आहे. यंदा भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदके जिंकली आहेत.
भारताने यंदाच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असली, तरी त्यांना गोल्ड कोस्ट येथे २०१८ मध्ये झालेल्या गेल्या स्पर्धेतील पदकसंख्या ओलांडता आली नाही. यंदा नेमबाजीचा समावेश नसतानाही भारताच्या अन्य क्रीडाप्रकारांतील खेळाडूंनी चुणूक दाखवली. भारताने स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी चार सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले.
भारताने बॅडिमटनमध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली. अखेरच्या दिवशी पी.व्ही. सिंधूने महिला एकेरीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. यानंतर पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने बाजी मारली. पुरुषांच्या दुहेरीत सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने सुवर्णकामगिरी केली. टेबल टेनिसमध्ये अंचता शरथ कमलने पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकले. त्याचे या गटातील हे तिसरे सुवर्णपदक आहे. साथियानने पुरुष एकेरीत कांस्यपदक मिळवले. यंदा भारताला सर्वाधिक १२ पदके ही कुस्तीमध्ये मिळाली. तसेच वेटलिफ्टिंग, अथलेटिक्स आणि बॉक्सिंग या खेळांमधील खेळाडूंनी भारताच्या पदकसंख्येत भर घातली. भारतात फारशा प्रचलित नसलेल्या लॉन बॉल्स या खेळाने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवून दिले.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…