Categories: पालघर

वसईत अद्ययावत शवागाराची वाणवा

Share

विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महापालिकेची स्थापना झाल्यापासून १३ वर्षे झाली. मात्र अद्यापही महापालिकेची भिस्त वसई पश्चिमेतील नवघर या एकाच शवागारावर आहे. वसई पूर्व व पश्चिम विभागासाठी नवघर येथील एकच शवागार असल्याने एखाद्या वेळेस मयतांचा आकडा जास्त असला की मयताचे शवविच्छेदन होईस्तोवर त्याच्या नातेवाईकांना मनस्ताप भोगावा लागतो. त्यामुळे अद्ययावत शवगृहासाठी महापालिकेकडे नागरिकांनी मागणी केली आहे.

वसई पूर्व व पश्चिम अशा दोन्ही भागाची लोकवस्ती सध्या वेगाने वाढत आहे. मात्र या मोठ्या लोकवस्तीच्या परिसरासाठी नवघर येथे केवळ एकच शवागार आहे. एखाद्यावेळेस प्रेतांची संख्या वाढली की शवविच्छेदनासाठी त्यांना कामण येथील शवविच्छेदन केंद्रात पाठवले जाते. कामण येथे डॉक्टर उपलब्ध नसल्यास पुन्हा नवघर येथे मयताला घेऊन यावे लागते. यात मयताची हेळसांड तर होतेच; मात्र मयताच्या नातेवाईकांचेदेखील हाल होतात. वसईत शवविच्छेदनाची व्यवस्था होऊ न शकल्यास मृत्ताच्या नातेवाईकांना मुंबई गाठावी लागते. यात नागरिकांचा बराचसा वेळ व पैसा वाया जातो.

महापालिकेची स्थापना झाल्यापासून महापालिकेने अद्यावत शवगृह नसल्याने मयतांना मृत्यूनंतरदेखील यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे अद्यावत शवागारासाठी पालिकेकडे मागणी होत आहे.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

1 hour ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

4 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

4 hours ago