महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये कोरोना वाढीचा वेग १० टक्क्यांच्या पुढे

Share

नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोविड-१९ रुग्णवाढीवर केंद्र सरकारने धोक्याची इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि तेलंगणाच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहून या सात राज्यांमध्ये साप्ताहिक रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे.

भूषण म्हणाले, “कोरोना प्रतिबंधक लसीसाठी पात्र असलेल्या लोकांच्या लसीकरणाची गती वाढवणे आणि कोरोना रोखण्यासाठीचे पाच नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. एक पत्रक जारी करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले की आगामी काळात विविध उत्सवांसाठी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे रुग्ण वाढ होऊन मृत्यूमध्ये वाढ होऊ शकते. रुग्णसंख्या जास्त येत असलेल्या जिल्ह्यांवर नजर ठेवत उपाययोजना करा, पॉझिटिव्हिटी रेट आणि संसर्ग न वाढू देण्यासाठी प्रयत्न करा आणि केस मॅनेजमेंट करण्याचे आवाहन देखील केंद्रीय आरोग्य सचिवांनी केले आहे.

देशात २४ तासांत भारतात १९,४०६ नवीन कोरोना रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात १९,४०६ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून ४९ मृत्यूची नोंद झाली आहे. एकूण संक्रमणांपैकी ०.३१ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.५० टक्के आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी पाच जणांचा मृत्यू

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महाराष्ट्रात 2024 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर 2190 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात सध्या 11906 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Recent Posts

महारेरा ३६९९ प्रकल्पांच्या ‘ओसीं’ची सत्यता तपासणार!

मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…

44 minutes ago

Pakistani Hindu Visa: पाकिस्तानी हिंदूंचा व्हिसा रद्द होणार नाही, सरकारची घोषणा

नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…

59 minutes ago

भारतीय वायुसेनेने सुरू केला युद्धाभ्यास

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने 'एक्सरसाईज…

1 hour ago

नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांमध्ये उचललाच पाहिजे, भूषण गगराणी यांचे निर्देश

मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८…

2 hours ago

ज्यांना काश्मीरला जायचं आहे त्यांनी संपर्क साधावा, मनसे नेते संदीप देशपांडे यांचे काश्मीरला जाण्याचे पर्यटकांना आवाहन

मुंबई : “ज्यांना काश्मीरला जायचं आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीरला जाणाच्या सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून…

3 hours ago

श्रवण दोष बाधित बालक: जागरूकता आणि उपाययोजना

डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…

8 hours ago