मुंबई (प्रतिनिधी) : भाजपतर्फे दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांना १० लाख रुपयांचे विमा कवच देणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा भाजप उतरविणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दहीहंडी उत्सव म्हणजे आनंद, उत्साहाला उधाण आणणारा. गोविंदांचे उंचच उंच थर आणि दिलेली सलामी तसेच फोडण्यात येणाऱ्या दहीहंडीचा क्षण हा डोळ्यांचे पारणे फिटविणारा असला तरी तो गोविंदांसाठी तितकाच जोखमीचा असलेला क्षण असतो. या सोहळ्यात जखमी झालेल्या गोविंदांकडे कानाडोळा करण्यात येतो. अपघातामुळे अनेक गोविंदांच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटून जाते. कधीकधी जीवावरही बेतते.
दहीहंडी हा महाराष्ट्रासाठी आणि विशेष म्हणजे मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. मुंबईच्या दहीहंडीची चर्चा जगभरात होत असते. दही हंडीच्या थरावरून पडल्याने अनेक गोविंदांनी आपले प्राण गमविले तर अनेकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. या सर्व बाबी ध्यानात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने भाजपतर्फे उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांना १० लाख रुपयांचे विमा कवच देणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा भाजप उतरविणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दहीहंडीच्या उत्सवात सहभागी झालेल्या गोविंदांना अपंगत्व आल्यास किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
नवी मुंबई : भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचा म्होरक्या नवीन चिचकरचे वडील आणि नामांकित बांधकाम…
मुंबई : मुंबईतील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून बेस्टची ओळख आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होण्यासाठी…
'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला मुंबई : करण जोहरने (Karan Johar) नुकतेच त्याच्या नव्या चित्रपटाची…
नवी दिल्ली : वक्फ (दुरुस्ती) कायदा २०२५ ला (Waqf Amendment Act 2025) आव्हान देणाऱ्या याचिकांवर…
उन्हाळा सुरु झाला की अनेकांना उष्णतेचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. शरीरात डिहायड्रेशन होण्याची भीती असते.…
इस्लामाबाद : पहलगाम येथे पर्यटकांवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान…