प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर १.४५ लाख रुपयांच्या कर्जाचे ओझे

इस्लामाबाद : पहलगाम येथे पर्यटकांवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. भारताने पाकिस्तानची राजकीय आणि आर्थिक कोंडी करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानने भारताला उत्तर देण्याची धडपड सुरू केली आहे. गरज पडली तर सिमला करार मोडू अशी धमकी पाकिस्तानने दली आहे. यामुळे भारत - पाकिस्तान यांच्यात लढाई होण्याची शक्यता वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीची ताजी आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. या आकडेवारीनुसार प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर १.४५ लाख रुपयांच्या कर्जाचे ओझे आहे.



पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय गंगाजळी आता फक्त १५.४३६ बिलियन डॉलर एवढीच उरली आहे. पाकिस्तानमध्ये 'रोटी' करण्यासाठीचा आटा (पीठ) भारताच्या तुलनेत दुपटीने महाग आहे. पाकिस्तानमध्ये पाच किलो आटा किमान ५६० रुपये दराने उपलब्ध आहे. सध्या पाकिस्तानमध्ये तांदूळ २७५ रुपये किलो या दराने उपलब्ध आहे. पाकिस्तानमध्ये चण्याची डाळ ५७५ रुपये किलो या दराने मिळत आहे. तसेच पाकिस्तानमध्ये साखर १८५ रुपये किलो आणि सफरचंद ५३० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी टोमॅटो ८१ रुपये किलो दराने मिळत आहे.



डिसेंबर २०२४ पर्यंत पाकिस्तानवरचे परकीय कर्ज १३१.१ बिलियन यूएस डॉलर वर पोहोचले. या कर्जाचा विचार करता प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर १.४५ लाख रुपयांच्या कर्जाचे ओझे आहे. पाकिस्तानने चीन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब आमिराती या तीन देशांकडून मोठे विदेशी कर्ज उचलले आहे. हे कमी म्हणून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून ४.४ बिलियन यूएस डॉलरचे कर्ज घेतले आहे.

भरमसाठ कर्ज घेणाऱ्या पाकिस्तानने हप्ते फेडणे पण कठीण झाले आहे. वारंवार विनंती करुन पाकिस्तानने २०२४ मध्ये चीन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब आमिराती या तीन देशांकडून कर्जाच्या परतफेडीची मुदत एक वर्षाने वाढवून घेतली. हे करण्याच्या बदल्यात पाकिस्तानला अनेक अटी शर्तींचे पालन करण्याची तयारी दाखवावी लागली.
Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी