ई-रिक्षाच्या विरोधात माथेरानमध्ये अश्वपालकांचा मूक मोर्चा

माथेरान (वार्ताहर) : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करावी, यासाठी नुकतीच चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झालेली आहे. आगामी काळात ई-रिक्षा सुरू झाल्यास व्यवसायावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे अश्वपालकांनी मूक मोर्चा काढला. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे व अधीक्षक कार्यालयात जाऊन ई-रिक्षाच्या विरोधात त्यांनी निवेदन सादर केले आहे.


वाहनास प्रतिबंध असलेले आशिया खंडातील माथेरान हे एक पर्यटनस्थळ आहे. ई-रिक्षामुळे पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या अश्वपालकांचा व्यवसाय असुरक्षित होणार आहे. स्थानिक प्रशासनाने आम्हा अश्वपालकांना विश्वासात न घेता शासनाकडून कडक निर्बंध लादले जात आहेत. आम्ही भूमिपुत्र म्हणून गावाच्या विकासासोबत राहिलो आहोत. ई-रिक्षामुळे ४६० घोड्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. ई-रिक्षाच्या चाचणीस विरोध असल्याचे अश्वपालकांनी निवेदनात नमूद केले आहे.

Comments
Add Comment

मंगेश काळोखे हत्या प्रकरणात २० लाखांची सुपारी देऊन हत्या

पुणे कनेक्शन उघड, १२ आरोपी अटकेत अलिबाग : खोपोलीच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निघृण

मापगाव बंगला सशस्त्र दरोड्यात २० लाखांचा ऐवज लंपास

संशयित पोलिसांच्या ताब्यात, उर्वरित आरोपींचा शोध सुरू अलिबाग : मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुशेत परिसरात

सबळ पुराव्यांअभावी आदिवासींचे वनहक्क दावे फेटाळले

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ६ हजार ६५६ जणांचे वनहक्क दावे मंजूर करण्यात आले असून, १ हजार ८०४ दावे फेटाळण्यात आले.

रायगड गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कामगिरी, ११ महिन्यांत ८९ गुन्ह्यांची उकल

अलिबाग (प्रतिनिधी) : सरत्या २०२५ या वर्षात रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दमदार कामगिरी केली

न्यायव्यवस्थेचे डिजिटलायझेशन; जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती

अलिबाग (प्रतिनिधी) : अनेकदा गुन्ह्याच्या खटल्यात पंच, साक्षीदार फितूर झाल्याने खटल्याच्या निकालावर परिणाम होत

सुक्या मासळीची आवक वाढल्याने दर आटोक्यात

अलिबाग : रायगड जिल्हा ताज्या मासळीबरोबरच सुक्या मासळीसाठीही प्रसिद्ध असल्याने जिल्ह्यात ठिकाठिकाणी सुक्या