ई-रिक्षाच्या विरोधात माथेरानमध्ये अश्वपालकांचा मूक मोर्चा

माथेरान (वार्ताहर) : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करावी, यासाठी नुकतीच चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झालेली आहे. आगामी काळात ई-रिक्षा सुरू झाल्यास व्यवसायावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे अश्वपालकांनी मूक मोर्चा काढला. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे व अधीक्षक कार्यालयात जाऊन ई-रिक्षाच्या विरोधात त्यांनी निवेदन सादर केले आहे.


वाहनास प्रतिबंध असलेले आशिया खंडातील माथेरान हे एक पर्यटनस्थळ आहे. ई-रिक्षामुळे पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या अश्वपालकांचा व्यवसाय असुरक्षित होणार आहे. स्थानिक प्रशासनाने आम्हा अश्वपालकांना विश्वासात न घेता शासनाकडून कडक निर्बंध लादले जात आहेत. आम्ही भूमिपुत्र म्हणून गावाच्या विकासासोबत राहिलो आहोत. ई-रिक्षामुळे ४६० घोड्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. ई-रिक्षाच्या चाचणीस विरोध असल्याचे अश्वपालकांनी निवेदनात नमूद केले आहे.

Comments
Add Comment

टाटा मिनी बसचा अपघात, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोघांचा मृत्यू

कर्जत : समृद्धी महामार्गावर कर्जतजवळ बोगद्यात टाटा मिनी बसचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे

अरे बापरे! मांडवा जेट्टीच्या नव्या पुलाचे खांब निकामी होण्याच्या मार्गावर; जेट्टी कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता

लोखंडी सळ्याही आल्या बाहेर, मूलभूत सुविधांचाही अभाव अलिबाग : गेटवे-मुंबई ते मांडवा-अलिबागला जलमार्गाने

रायगड जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

अलिबाग  : आलिशान चारचाकी वाहनाने रेकी करून रायगड जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

कर्जत : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत - सीएसएमटी (मुंबई सीएसएमटी किंवा छत्रपती

ताम्हिणी घाटात भीषण अपघात, दरड गाडीवर कोसळल्याने महिलेचा मृत्यू!

रायगड: सनरुफ असलेल्या आलिशान चारचाकीवर दरड कोसळल्याची घटना पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात घडली आहे. ही

इंदापूर-कशेडी दरम्यान ९ महिन्यांत ३६ जणांचा मृत्यू

मुंबई - गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरण कामाचा फटका अलिबाग  : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या