पावसाअभावी मोखाड्यातील नागली, वरईची पिके संकटात

मोखाडा (वार्ताहर) : मोखाडा तालुक्यात वरुणराजाने अवकृपा केल्याने भात नागली व वरईची पिके उन्हामुळे करपू लागल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. ऐन पावसाळ्यात पिकांना कडक उन्हाळ्यासारखी परिस्थिती उद्भवल्याने नागली व वरईची रोपे पिवळी पडून संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत, तर लावणी केलेली पिके कडक उन्हामुळे करपू लागली आहेत.


चालू वर्षी जुलै महिन्याच्या सुरवातीला पाऊस चांगला पडल्यामुळे शेतकऱ्यांनी भात पिकाची लावणी मोठ्या आनंदाने केली. मात्र हा आनंद निसर्गाने शेतकऱ्यांकडून हिरवून घेतला आहे. मोखाडासारख्या आदिवासीबहुल भागात खरीपामध्ये नागली, वरई यांसारखी प्रमुख पिके घेतली जातात. गेल्या सात ते आठ दिवसांपासून या भागात पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे नागली, वरई या पिकांची रोपे लागणीच्या टप्प्यात आली असून पावसाअभावी करपून चालली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.


खरीप हंगामात पावसाची गरज असताना पावसाने ओढ दिली असून नागली, वरईसाठी अपेक्षित पावसाची गरज आहे. पाऊस नसल्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत, तर नागली, वरईची लावणी केलेल्या रोपांची उन्हामुळे पिके करपू लागली आहेत. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे.


जव्हार, मोखाडा तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या नागली, वरीचे पीक उन्हामुळे सुकून गेले आहे. गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून कडक ऊन पडत आहे. त्यामुळे तृणधान्य पीक असलेली नागली, वरी शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. - प्रदीप वाघ, सदस्य, मोखाडा पंचायत समिती


यंदाही उत्पादनात घट होण्याची शक्यता


मृग व आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीला काहीशा प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांची शेती कामांची लगबग सुरू केली. मात्र त्यानंतर कडक ऊन पडून रोपे पिवळी पडू लागली. मोखाडा तालुक्यात सात ते आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खोडाळा परिसरातील नागलीचे पीक करपू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, यंदाही नागली व वरईच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Comments
Add Comment

नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार