जिल्ह्यात सिकलसेल आजाराबाबत जनजागृती

पाच लाखांहून अधिक नागरिकांची सिकलसेल तपासणी


पालघर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्ह्यात सिकलसेल आजाराबाबत जनजागृती वाढविणे, आजाराचे लवकर निदान करून रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिकलसेल जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सन २०२१ पासून आतापर्यंत एकूण ५ लाख १४ हजार ९३४ नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये १२ हजार ४२१ सिकलसेल वाहक तसेच ९७५ सिकलसेलग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांची माहिती सिकलसेल पोर्टलवर ऑनलाईन नोंदविण्यात आली असून त्यांना शासनामार्फत मोफत औषधोपचार, आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा व समुपदेशन सेवा दिल्या जात आहेत. तसेच पात्र रुग्णांना संजय गांधी निराधार योजना अंतर्गत आर्थिक मदतही दिली जात आहे.


सिकलसेल हा अनुवांशिक आणि रक्तपेशींशी संबंधित आजार असून तो आई-वडिलांकडून अपत्यांमध्ये संक्रमित होतो. या आजारामध्ये लाल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या व ताठर बनतात. या विकृत रक्तपेशी रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात, परिणामी संबंधित अवयवांतील रक्तपुरवठा खंडित होऊन रुग्णांना तीव्र आणि असह्य वेदना सहन कराव्या लागतात. याचा डोळे, प्लीहा, यकृत, त्वचा तसेच इतर अवयवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. सिकलसेल आजारावर संपूर्ण उपचार उपलब्ध नसला तरी योग्य वेळी तपासणी, नियमित उपचार, समतोल आहार आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन केल्यास आजारावर प्रभावी नियंत्रण
ठेवता येते.


वाहक–वाहक, वाहक–रुग्ण किंवा रुग्ण–रुग्ण यांच्यात विवाह झाल्यास होणारे अपत्य सिकलसेल वाहक किंवा रुग्ण होण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे विवाहपूर्व सिकलसेल तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सिकलसेल आजाराची लक्षणे म्हणून रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, हात-पाय सुजणे, भूक मंदावणे, सांधेदुखी, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, लहान बालकांमध्ये वारंवार जंतुसंसर्ग होणे तसेच शरीर पिवळसर होणे ही लक्षणे दिसून येतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सिकलसेल तपासणी करून घ्यावी व या जनजागृती सप्ताहात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी केले आहे.


Comments
Add Comment

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

Heavy Rain In Palghar : घोणसई गावाला पाण्याचा वेढा; मुख्य पूल पाण्याखाली

- मुख्य पूल बुडाल्याने गावाचा बाहेरील संपर्क खंडित वाडा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन

Vandri Dam Waterfall : धबधब्यावर जाताय? थांबा! पालघरच्या वांद्री धबधब्यावर घडला थरार

धबधब्यांवर पाणी अचानक वाढलं आणि पर्यटकांची उडाली तारांबळ पालघर : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर

Girish Mahajan : पालघर पूरस्थितीवर सरकार ॲक्शन मोडमध्ये; गिरीश महाजनांचा दौरा, अभ्यासगटाची घोषणा

पालघर : मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती (Flood Situation) निर्माण झाली असून जनजीवन (Normal

Vasai Rain : मुसळधार पावसाचा फटका! वसईत इमारतीचा सज्जा कोसळला, रस्ते जलमय

वसई : मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू असतानाच वसई (Vasai) परिसरात इमारतींशी संबंधित दुर्घटनांची (Building Accidents) मालिका सुरूच आहे.