Categories: देश

हवाई दलातून २०२५ पर्यंत मिग विमाने हद्दपार

Share

श्रीनगर (वृत्तसंस्था) : ‘मिग-२१’ या लढाऊ विमानांना वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने देशाच्या सुरक्षेत महत्त्वाचे योगदान देणारी ही विमाने आपल्या ताफ्यातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये गत्रुवारी मिग विमान कोसळले होते. त्यात २ वैमानिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

श्रीनगर हवाई तळावर तैनात हे स्क्वाड्रन फेब्रुवारी २०१९ मध्ये बालाकोटवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे चर्चेत आले. या हल्ल्यात मिग बायसन विमानाने पाकचे अत्याधूनिक एफ-१६ विमान पाडले होते. याच स्क्वाड्रनचे मिग-२१ विमान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान उडवत होते. सप्टेबर महिन्यानंतर हवाई दलाकडे मिग-२१ विमानांचे केवळ ३ स्क्वाड्रन शिल्लक राहतील. यातील प्रत्येकी एक स्क्वाड्रन दरवर्षी रिटायर केले जाईल. म्हणजे २०२५ पर्यंत मिग-२१ विमानांचा ताफा हवाई दलातून पूर्णतः हद्दपार होईल.

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात गत्रुवारी सायंकाळी मिग-२१ कोसळले. त्यात २ वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाडमेरच्या भीमदा गावात अर्धा किलोमीटरच्या परिसरात या विमानाचे अवशेष कोसळले. या अपघातामुळे पुन्हा एकदा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील सोव्हियत वंशाच्या मिग-२१ विमानातील त्रुटी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या होत्या.

उडत्या शवपेट्या…

मिग-२१च्या सुरक्षिततेचा रेकॉर्ड अत्यंत वाईट आहे. पण, या प्रक्रियेत विलंब होत असल्यामुळे हवाई दलाला मिग विमानांशिवाय दुसरा पर्याय नव्हता. १९६३ पासून भारतीय हवाई दलाला विविध श्रेणीतील ८७२ मिग लढाऊ विमाने मिळाली आहेत. यातील जवळपास ५०० फायटर जेट क्रॅश झालेत. त्यात २०० हून अधिक पायलट्स व ५६ सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात झाल्यामुळे मिग-२१ विमानांना उडत्या शवपेट्या व विडो मेकर म्हटले जाते.

Recent Posts

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

16 minutes ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

46 minutes ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

1 hour ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

1 hour ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

2 hours ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

3 hours ago