मुंबई (हिं.स.) : मुंबईतील शिवाजी नगरच्या बैंगनवाडी परिसरात एका घरामध्ये चार जणांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे.
शकील जलील खान (वय ३४), राबिया शकील खान (वय २५), सरफ़राज़ शकील खान (वय ७) आणि अतिफा खान (वय ३) अशी मृतांची नावे आहेत.
मुंबईच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रस्ता क्रमांक १४ बैंगनवाडी या वसाहतीत हा प्रकार उघडकीस आला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. ही आत्महत्या आहे की, हत्या याचा तपास पोलीस करत आहेत. हे चारही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी राजावाडी शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आले आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…