मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३० जुलैपासून राज्याच्या दौऱ्यावर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील ठराविक भागांचा दौरा करणार आहेत. शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर भाजपाशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदेंच्या मंत्रिमंडळात भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नसला तरी ३० जुलैपासून मुख्यमंत्री शिंदे पूरग्रस्त भागाची पाहाणी आणि इतर लोकोपयोगी कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत, असे शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले.


३०, ३१ जुलै आणि २ ऑगस्ट या दिवशी एकनाथ शिंदे मराठावाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री औरंगाबाद, सिल्लोड, येवला, वैजापूर पुणे या भागात स्थानिक पातळीवरचे प्रश्न ऐकून, सर्व घटकातील समस्या आणि निवेदनदेखील स्वीकारणार आहेत. मुख्यमंत्री हे आधी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्यासोबत आढावा घेतील. याचप्रमाणे विकास कामातील आढावा, कार्यकर्ता मेळावादेखील होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.


दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे हे सातत्याने सांगत आहेत की ते अजूनही शिवसेनेतेच आहेत. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिंदे गटातील आमदारांवर कायम टीका करताना दिसतात. अशा परिस्थितीत राज्यभर फिरून सामान्य जनता आणि सर्वसामान्य शिवसैनिक यांच्याशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन करणे हा शिंदे यांचा मुळ हेतु असल्याची चर्चा रंगली आहे. या दौऱ्यात अब्दुल सत्तार यांच्या भागात एक मेळावा होणार आहे. संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री मुक्काम करतील त्यावेळी शिंदे गटाचा नव्हे तर शिवसेनेचा मेळावा होणार आहे, असे उदय सामंत यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून, शिंदे गट हा शिवसेनाच असल्याचे बिंबवण्याचा आणखी एक प्रयत्न शिंदे गटाकडून केला जाईल असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री